शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या हाती भिक्षापात्र

By admin | Updated: July 26, 2014 23:53 IST

अतिवृष्टीने चार दिवसांपूर्वी संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्यामुळे तालुक्यातील वडगाव राजदी येथील एका कुटुंबावर अक्षरश: हाती भिक्षापात्र घेण्याची वेळ

मोहन राऊत - धामणगाव रेल्वेअतिवृष्टीने चार दिवसांपूर्वी संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्यामुळे तालुक्यातील वडगाव राजदी येथील एका कुटुंबावर अक्षरश: हाती भिक्षापात्र घेण्याची वेळ आली आहे़ गावात घरोघरी उसनवारी करून आतापर्यंत या शेतकरी कुटुंबाने गुजराण केली. परंतु आता या कुटुंबाकडे ग्रामस्थही दुर्लक्ष करीत असल्यामुळे जगावे कसे? असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे. वडगाव राजदी येथील गिरजाबाई वामनराव मेश्राम या महिलेचे घर मागील आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळी पावसाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त झाले. यात घरातील कर्ता पुरूष सुनील मेश्राम (३२), जोत्स्ना सुनील मेश्राम (२८), सुहानी (५), सोहम (२) हे गंभीर जखमी झाले. या कुटुंबाने रात्रीच गावातील समाज मंदिरात आश्रय घेतला. चार दिवसांपासून हे कुटुंब समाज मंदिरात आहे़ त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याची विल्हेवाट लागली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही सोय नसल्याने या कुटुंबाला सध्या गावकरी मदत करीत आहेत. परंतु हे कुठवर चालणार? हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाकडून या कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकटझाली आहे. या गावातील तलाठ्याने दोन दिवसानंतर कोसळलेल्या घराचे सर्वेक्षण केले. परंतु संपूर्ण घर जमीनदोस्त होऊन अशंत: नुकसान दाखविण्याचा प्रताप तलाठ्याने केला़