शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण होतेय लुप्त

By admin | Updated: September 29, 2015 01:46 IST

स्मार्ट सिटीचा बँड वाजत असतानाच शहरातील अनेक मुख्य चौकांचे सौंदर्य बिघडले आहे. चौकातील पुतळ्यांचा रंग उडाला.

शहरातील वेलकम चौक, मॉ जिजाऊ चौक, दस्तुरनगर चौक, राजापेठ चौक, चित्रा चौक, पठाण चौक आदी चौंकांचे सौंदर्यीकरण महानगरपालिकेने केले आहेत. त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. तरीही चौकांची देखभाल, स्वच्छता राखली जात नाही. म्हणजे ही सामान्य जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही काय? चौक सुशोभिकरण झाले तर शहराकडे बाहेरच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा राहील.मनीष कहाते ल्ल अमरावतीस्मार्ट सिटीचा बँड वाजत असतानाच शहरातील अनेक मुख्य चौकांचे सौंदर्य बिघडले आहे. चौकातील पुतळ्यांचा रंग उडाला. त्यामध्ये लावलेले लाईट बंद आहेत. लोेखंडी कठडे तुटलेले आहेत. लॉनची जागा गवताने घेतली आहे. चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यावर मातीचे ढिगारे चढले आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचा बॅन्ड जोरात वाजत आहे. शहरातील सर्वात मोठा चौक म्हणजे वेलकम अमरावती चौक. या चौकातून नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, पुणे इत्यादी ठिकाणी जाता येते. खासगी ट्रॅव्हल्स येथेच थांबतात. शहराचे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे मुख्यद्वार या चौकात आहे. त्यामुळे या चौकात दगडाने बांधलेल्या रस्त्याच्या दोन्ही कडेला भल्यामोठ्या भिंती उभ्या आहेत. त्यापैकी एका भिंतीवर फक्त इंग्रजीमध्ये ‘कम’ लिहले आहे. तर दुसऱ्या भिंतीवरचे ‘अमरावती’ नाव गायब झालेले आहे. दगडाच्या भिंतीवरचे दगड उखडलेले आहेत. भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे अर्धी भिंत झाडाझुडपांनी वेढली आहे. तेथील फुटपाथवर ठेवलेल्या बेंचच्यावर हॉटेल आणि खासगी ट्रॅव्हल्सने कब्जा केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना बसण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथील प्रत्येक भिंतीला वेलकम अमरावती नाव दिसण्याकरिता फोकस लाईट लावण्यात आले आहेत. परंतु तेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे केवळ दगडाच्या भिंती शोभेच्या वास्तु बनल्या अहेत. शहरातील पोलीस अधीक्षक बंगल्याशेजारी आणि परिवहन अधिकारी कार्यालयाजवळ असलेला जिजाऊ चौक या चौकांच्या सौंदर्यीकरणावर ७-८ महिन्यांपूर्वी ८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र सौंदर्यीकरणातील पाण्याचे कारंजे अद्याप सुरू झाले नाही. माँ जिजाऊच्या पुतळ्यावर माती बसली आहे. कारंज्याचे पाणी साठविण्याच्या टाक्यात शेवाळ साचलेले आहे. चौकातील पुतळ्याचे लोखंडी कम्पाऊंडचे गेट चोवीस तास उघडे राहते. पुतळा परिसरात विजेची आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे साडेआठ लाख रुपये खर्चून झालेले सौंदर्यीकरण नागरिकांच्या दृष्टिक्षेपास पडत नाही.चांदूररेल्वे मार्गावरील सुंदरलाल चौक, चौकात उभा असलेल्या ‘स्टॅच्यू’वरचा रंग उडाला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढलेली आहेत. त्यामध्ये तीन विजेचे लाईट आहेत. तेही भंगार अवस्थेत आहेत. दस्तुरनगर चौकातील पुतळ्याचा रंग उडालेला आहे. लोखंडी कठडे तुटलेले आहेत. मार्बलही उखडलेले आहे.चौकातील वाहतूक सिग्नल तुटलेले आहेत.शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळख असलेला राजापेठ चौक. यवतमाळ, अकोला आणि वाशीमकडे जाणाऱ्या बसेस याच चौकात थांबतात. अगदी त्याच ठिकाणी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. भलामोठा ‘स्टॅच्यू’ तिथे लावण्यात आला आहे. मात्र त्याच्यावरचा रंग उडाल्याने स्टॅच्यूला भेगा पडल्या आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून पाण्याचे कारंजे बंद पडले आहेत. त्यामधील स्टाईल उखडलेल्या आहेत. विजेचे दिवे भंगार अवस्थेत आहे. कठड्याच्या आजूबाजूला जाहिरातीचे फलक लागलेले आहेत. लॉनची जागा गवताने, काडीकचऱ्याने घेतली आहे. बेंचची जागा दारुड्यांनी घेतली आहे. सौंदर्यीकरणाच्या फरशीवर गांजा ओढणारे बसतात. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला नळ लावलेला आहे. त्याचा वापर हे दारुडे करतात. शहरातील चित्रा चौकातील स्टिलचे कठडे तुटलेले आहेत. खालचा सिमेंट काँक्रीटचा भाग उखडलेला आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातील पाण्याचे फवारे बंद आहेत. लोखंडी कठडे तुटलेले आहेत.राजापेठ चौकाचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. सौंदर्यीकरण झाले तर चार लोकं अनंदाने बसतील.- अतुल गावंडे,नागरिक, राजापेठ.शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे वेलकम पॉर्इंट. हे ठिकाण भकास असेल तर शहर कसे असणार, असा प्रश्न शहराबाहेरील व्यक्तीला नक्कीच पडतो.- आशिष मालू,नागरिक, अमरावती.शहरातील रस्ते, चौक चकाचक पाहिजे. तरच स्मार्ट सिटीचा उदोउदो करा. सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे.- शरद देरणकर,नागरिक, अमरावती.