शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली.

ठळक मुद्देदर चार हजार पार : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीओसीची वाढती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचा परिणामी स्थानिक बाजार समितीतही दिसून येत आहे. यंदाचे हमीभाव ३ हजार ७१० रुपये असताना आवक कमी व पावसामुळे मालाचा दर्जा घसरल्याने राणी प्रतीच्या सोयाबीनला बुधवारी ४२०० रुपये दर मिळाला.ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली. मात्र, पाऊस उसंतच घेईनात! गंजीतील सोयाबीन उन्हाअभावी कुजण्याच्या स्थितीत पोहोचला होता. काहींनी पावसाच्या मोसमातच सोयाबीन काढला. त्यामुळे ओला असताना काढलेला सोयाबीन तडण मिळू न शकल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना तो तशाच अवस्थेत विकावा लागला. जिल्ह्यात प्रत खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने काहींनी आधीच विकला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शासनाने जाहीर केलेला हमीभाव ३ हजार ७१० असताना आवकच्या तुलनेत सोयाबीनला सध्या ३९८१ ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.ढगाळ वातावरणाचा आवकवर परिणामयंदा भर पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला. उत्पादनही घटल्यामुळे भाव बºयापैकी मिळत आहे. बाजार समितीत मंगळवारी ६३९२ पोत्यांची आवक झाली. राणी स्वरुपाच्या सोयाबीनला ४२००, मध्यम दर्जाचा ४००० व हलका सोयाबीन ३९८१ असा दर बुधवारी मिळाला. त्यामुळे बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेरील शेतमाल विक्रीकरिता येत असतानासुद्धा गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याचे अडते संचालक प्रमोद इंगळे यांनी सांगितले.१७२ शेतकऱ्यांचा शेतमाल तारणसध्या भाव जरी चांगला असला तरी यंदा सोयाबीनची आवक घटल्याने भविष्यात वाढीव दराचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांनी चांगला सोयाबीनचा ७ हजार ९९० क्विंटल माल विक्रीऐवजी तारण ठेवला आहे. त्यावर एक कोटी ६८ लाख ८१ हजार ९०० रुपये कर्ज संबंधित शेतकºयांनी उचलल्याची माहिती शेतमाल तारण विभागप्रमुख पवन देशमुख यांनी दिली.डीओसीच्या उत्पादकेवरून ठरतेय सोयाबीनचे दरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर डीओसीच्या उत्पादकतेवरून ठरतात. जसे की ३० टक्के तेल काढल्यानंतर त्या सोयाबीनच्या पेंडापासून जे - जे पदार्थ तयार करण्याची क्षमता असते, त्यावरून सोयाबीनचे दर ठरतात. डीओसीद्वारा सोयाबीनचे दर वाढले असून, पुढे आणखी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास घाई करू नये, असा सल्ला संचालक विकास इंगोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Marketबाजार