शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली.

ठळक मुद्देदर चार हजार पार : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीओसीची वाढती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचा परिणामी स्थानिक बाजार समितीतही दिसून येत आहे. यंदाचे हमीभाव ३ हजार ७१० रुपये असताना आवक कमी व पावसामुळे मालाचा दर्जा घसरल्याने राणी प्रतीच्या सोयाबीनला बुधवारी ४२०० रुपये दर मिळाला.ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली. मात्र, पाऊस उसंतच घेईनात! गंजीतील सोयाबीन उन्हाअभावी कुजण्याच्या स्थितीत पोहोचला होता. काहींनी पावसाच्या मोसमातच सोयाबीन काढला. त्यामुळे ओला असताना काढलेला सोयाबीन तडण मिळू न शकल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना तो तशाच अवस्थेत विकावा लागला. जिल्ह्यात प्रत खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने काहींनी आधीच विकला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शासनाने जाहीर केलेला हमीभाव ३ हजार ७१० असताना आवकच्या तुलनेत सोयाबीनला सध्या ३९८१ ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.ढगाळ वातावरणाचा आवकवर परिणामयंदा भर पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला. उत्पादनही घटल्यामुळे भाव बºयापैकी मिळत आहे. बाजार समितीत मंगळवारी ६३९२ पोत्यांची आवक झाली. राणी स्वरुपाच्या सोयाबीनला ४२००, मध्यम दर्जाचा ४००० व हलका सोयाबीन ३९८१ असा दर बुधवारी मिळाला. त्यामुळे बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेरील शेतमाल विक्रीकरिता येत असतानासुद्धा गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याचे अडते संचालक प्रमोद इंगळे यांनी सांगितले.१७२ शेतकऱ्यांचा शेतमाल तारणसध्या भाव जरी चांगला असला तरी यंदा सोयाबीनची आवक घटल्याने भविष्यात वाढीव दराचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांनी चांगला सोयाबीनचा ७ हजार ९९० क्विंटल माल विक्रीऐवजी तारण ठेवला आहे. त्यावर एक कोटी ६८ लाख ८१ हजार ९०० रुपये कर्ज संबंधित शेतकºयांनी उचलल्याची माहिती शेतमाल तारण विभागप्रमुख पवन देशमुख यांनी दिली.डीओसीच्या उत्पादकेवरून ठरतेय सोयाबीनचे दरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर डीओसीच्या उत्पादकतेवरून ठरतात. जसे की ३० टक्के तेल काढल्यानंतर त्या सोयाबीनच्या पेंडापासून जे - जे पदार्थ तयार करण्याची क्षमता असते, त्यावरून सोयाबीनचे दर ठरतात. डीओसीद्वारा सोयाबीनचे दर वाढले असून, पुढे आणखी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास घाई करू नये, असा सल्ला संचालक विकास इंगोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Marketबाजार