शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल व्हा संवेदनशील

By admin | Updated: March 6, 2017 00:11 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी काही शाळा याबाबत तितक्या जागरुक नाहीत.

सीबीएसई शाळांकडून अपेक्षा : मार्गदर्शक तत्त्वे जाहीरअमरावती : शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी काही शाळा याबाबत तितक्या जागरुक नाहीत. शाळांना याबाबत संवेदनशील बनविण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सीबीएसईने नव्याने विस्तृत सूचना जाहीर केल्या आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक कशाप्रकारे करावी याबाबत शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. असे असतानाही काही शाळांकडून त्यांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सीबीएसईकडे आल्या आहेत. त्यांची दखल घेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना अत्यंत विश्वासाने शाळांकडे सोपविले असते. त्या शाळांनी इमानाला जागायला हवे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला हवे. स्कूल बसचे बाह्य आणि आंतरिक स्वरुप बसमधील कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेल्या तरतुदी दिलेल्या सुविधा वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने तसेच शाळांनी घ्यावयाची इतर काळजी अशा विविध बाबींचा सीबीएसईकडून मिळालेल्या सूचनांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून माहिती घ्यावीज्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस व्यवस्था राबविली जाते, त्या विद्यार्थ्यांना त्याचा योग्य लाभ देण्यात येत आहे किंवा नाही याबाबतही शाळेने सातत्याने माहिती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना स्कूल बसच्या प्रवासात काही अडचणी आहेत किंवा नाही हे शाळांनी समजून घ्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे. स्कूल बसमध्ये मोबाईल फोन असावे, चार चाकी गाड्यांना पुे जाऊ नये, स्कूलबसच्या वाहन चालकाने कामाव्यतिरिक्त विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांशी बोलू नये, अशा विविध सूचनाही लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन आता सीबीएसई पॅटर्न शिकविणाऱ्या शाळा किती गांभीर्याने करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळांसोबतच पालकांनीदेखील सुरक्षिततेबाबत जागरुकता ठेवल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. (प्रतिनिधी)पालकांनी घालावे लक्षविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांकडे देतानाच सीबीएसईने पालकांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मुलांची वाहतूक सुरळीत पद्धतीने होत आहे. वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांकडून काही नियमभंग होत असल्यास शाळांना त्याबाबत माहीती द्यावी, पालक-शिक्षक सभांमध्ये स्कूल बसबाबत चर्चा करावी आणि वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने लक्ष द्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे.