शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल व्हा संवेदनशील

By admin | Updated: March 6, 2017 00:11 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी काही शाळा याबाबत तितक्या जागरुक नाहीत.

सीबीएसई शाळांकडून अपेक्षा : मार्गदर्शक तत्त्वे जाहीरअमरावती : शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी काही शाळा याबाबत तितक्या जागरुक नाहीत. शाळांना याबाबत संवेदनशील बनविण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सीबीएसईने नव्याने विस्तृत सूचना जाहीर केल्या आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक कशाप्रकारे करावी याबाबत शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. असे असतानाही काही शाळांकडून त्यांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सीबीएसईकडे आल्या आहेत. त्यांची दखल घेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना अत्यंत विश्वासाने शाळांकडे सोपविले असते. त्या शाळांनी इमानाला जागायला हवे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला हवे. स्कूल बसचे बाह्य आणि आंतरिक स्वरुप बसमधील कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेल्या तरतुदी दिलेल्या सुविधा वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने तसेच शाळांनी घ्यावयाची इतर काळजी अशा विविध बाबींचा सीबीएसईकडून मिळालेल्या सूचनांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून माहिती घ्यावीज्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस व्यवस्था राबविली जाते, त्या विद्यार्थ्यांना त्याचा योग्य लाभ देण्यात येत आहे किंवा नाही याबाबतही शाळेने सातत्याने माहिती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना स्कूल बसच्या प्रवासात काही अडचणी आहेत किंवा नाही हे शाळांनी समजून घ्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे. स्कूल बसमध्ये मोबाईल फोन असावे, चार चाकी गाड्यांना पुे जाऊ नये, स्कूलबसच्या वाहन चालकाने कामाव्यतिरिक्त विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांशी बोलू नये, अशा विविध सूचनाही लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन आता सीबीएसई पॅटर्न शिकविणाऱ्या शाळा किती गांभीर्याने करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळांसोबतच पालकांनीदेखील सुरक्षिततेबाबत जागरुकता ठेवल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. (प्रतिनिधी)पालकांनी घालावे लक्षविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांकडे देतानाच सीबीएसईने पालकांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मुलांची वाहतूक सुरळीत पद्धतीने होत आहे. वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांकडून काही नियमभंग होत असल्यास शाळांना त्याबाबत माहीती द्यावी, पालक-शिक्षक सभांमध्ये स्कूल बसबाबत चर्चा करावी आणि वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने लक्ष द्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे.