शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोची धडक

By admin | Updated: March 21, 2017 00:17 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागत असल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाने सोमवारी विद्यापीठात धडक देऊन कुलगुरूंना जाब विचारला.

विद्यापीठाचे निकाल लांबले : सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागत असल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाने सोमवारी विद्यापीठात धडक देऊन कुलगुरूंना जाब विचारला. मात्र विद्यार्थ्यांची आक्रमकता बघून दोन दिवसांत निकाल लावण्याचा निर्णय घेत कुलगुरूंनी यातून मार्ग काढला.भाजयुमोचे जिल्हा महासचिव सोपान कनरेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन विधी, अभियांत्रिकी, फार्मसीचे निकाल लांबणीवर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांत निकाल लावणे अपेक्षित आहे. मात्र, ७० ते ८० दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्यापही निकाल लागलेले नाही. दुसरीकडे परीक्षा विभागाचे ‘डिजिटायझेशन’ झाल्याचा गवगवा केला जात असताना निकाल उशिरा का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विधी अभ्यासक्रमांच्या निकालासाठी दीर्घ कालावधीपासून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. अंतिम वर्षाचे निकाल त्वरित न लागल्यास अनेक विद्यार्थ्यांवर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विधी, अभियांत्रिकी व फार्मसीचे निकाल लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा मार्ग खडतर झाला आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते, विद्यार्थी कल्याण विभागाचे गणेश माल्टे उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल कंगाले, बादल डकरे, अंकुश घायर, मांगल्य निर्मळ, अशोक विश्वकर्मा, जुगल यादव, करण महल्ले, पूजा भागवत, ऋचा देशपांडे, आरती पोकळे आदींनी कुलगुरूंच्या दरबारात त्यांच्या समस्या मांडल्यात. (प्रतिनिधी)परीक्षा विभागाचा प्रवास तंत्रज्ञान व मॅन्युअल असा दोन प्रकारे चालतो. गतवर्षीपासून नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे स्थावर होण्यास काही अवधी लागेल. मात्र, हिवाळी परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी अपूर्ण असून दोन दिवसांत निकाल लावण्याची तयारी केली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.