शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

रेल्वे तिकीट दलालांची बल्ले-बल्ले

By admin | Updated: October 25, 2014 02:04 IST

दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे.

अमरावती : दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर २० नोंव्हेबरपर्यत ‘नो-रुम’ झळकत असल्यामुळे अनेकांनी रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी दलालांशी संपर्क साधला आहे. मात्र पुणे, मुंबईसाठी चक्क एक हजार रुपयांच्या तिकीटाकरीता पाच हजार रुपये घेतले जात असल्यामुळे अनेकांच्या उत्सवावर विरजण आले आहे. सुट्या संपताच परत जाणे आवश्यक असल्यामुळे अनेकांनी रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे.अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दलालांचा सुळसुळाट ही नित्याचीच बाब असताना हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलही हतबल झाले आहे. तिकीटांची विक्री करणाऱ्या दलालांचे थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांची आरक्षण खिडक्यावर चलती आहे. आदल्या दिवसाच्या तिकीटांसाठी रात्री १२ वाजेपासूनच दलालांची माणसे रांगेत उभी राहतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविण्यास येताच त्याला सकाळी आठ वाजताच ५० ते ६० जणांची रांग लागलेली आढळून येते. हा प्रकार दिवाळी उत्सवापुरताच नसून दलालांची माणसे नेहमीच रांगेत लागलेली राहतात, हे वास्तव आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर तिकीटांचा काळा बाजार करण्यासाठी चांदुर रेल्वे, धामणगाव, बडनेरा व अमरावती येथील दलालांची माणसे रांगते उभी राहत असल्याची माहिती आहे. सामान्य व्यक्तीला रेल्वे गाड्यांचे आरक्षण नाही, मात्र रेल्वे तिकीटांची चढ्या दरात विक्री करणाऱ्याला प्राधान्य असे चित्र हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यावर आहे. दिवाळीचे औचित्य साधून मागील दोन महिन्यापूर्वीच रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या अनेक दलालांनी तिकीटांचे आरक्षण करुन ठेवले आहे. हे रेल्वे गाड्यांच्या तिकीटांचे आरक्षण आता अव्वाच्या सव्वा दरात विक्री केले जात आहे. विशेषत: पुणे, मुंबईच्या आरक्षण तिकीटांना हजारो रुपये मोजले जात आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर म्हणून अनेक जण रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेल त्या दरात खरेदी करण्याची तयारी दर्शवित असल्यामुळे दलालांनी तिकीटांचे दर वाढविले आहे.मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यत आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आॅक्टोंबरमध्ये मिळणाऱ्या रेल्वे आरक्षण तिकीटांसाठी दलालांच्या मर्जीनुसार रक्कम मोजली जात आहे. एकिकडे प्रवाशांची आर्थिक लूट चालली असताना रेल्वे प्रशासन मूकपणे हे सर्व बघत आहे. या प्रकाराला रेल्वे प्रशासन जबाबदार असून रेल्वे पोलिसांचे दलालांशी लागेबांधे आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)