शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रेल्वे तिकीट दलालांची बल्ले-बल्ले

By admin | Updated: October 25, 2014 02:04 IST

दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे.

अमरावती : दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर २० नोंव्हेबरपर्यत ‘नो-रुम’ झळकत असल्यामुळे अनेकांनी रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी दलालांशी संपर्क साधला आहे. मात्र पुणे, मुंबईसाठी चक्क एक हजार रुपयांच्या तिकीटाकरीता पाच हजार रुपये घेतले जात असल्यामुळे अनेकांच्या उत्सवावर विरजण आले आहे. सुट्या संपताच परत जाणे आवश्यक असल्यामुळे अनेकांनी रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे.अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दलालांचा सुळसुळाट ही नित्याचीच बाब असताना हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलही हतबल झाले आहे. तिकीटांची विक्री करणाऱ्या दलालांचे थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांची आरक्षण खिडक्यावर चलती आहे. आदल्या दिवसाच्या तिकीटांसाठी रात्री १२ वाजेपासूनच दलालांची माणसे रांगेत उभी राहतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविण्यास येताच त्याला सकाळी आठ वाजताच ५० ते ६० जणांची रांग लागलेली आढळून येते. हा प्रकार दिवाळी उत्सवापुरताच नसून दलालांची माणसे नेहमीच रांगेत लागलेली राहतात, हे वास्तव आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर तिकीटांचा काळा बाजार करण्यासाठी चांदुर रेल्वे, धामणगाव, बडनेरा व अमरावती येथील दलालांची माणसे रांगते उभी राहत असल्याची माहिती आहे. सामान्य व्यक्तीला रेल्वे गाड्यांचे आरक्षण नाही, मात्र रेल्वे तिकीटांची चढ्या दरात विक्री करणाऱ्याला प्राधान्य असे चित्र हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यावर आहे. दिवाळीचे औचित्य साधून मागील दोन महिन्यापूर्वीच रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या अनेक दलालांनी तिकीटांचे आरक्षण करुन ठेवले आहे. हे रेल्वे गाड्यांच्या तिकीटांचे आरक्षण आता अव्वाच्या सव्वा दरात विक्री केले जात आहे. विशेषत: पुणे, मुंबईच्या आरक्षण तिकीटांना हजारो रुपये मोजले जात आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर म्हणून अनेक जण रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेल त्या दरात खरेदी करण्याची तयारी दर्शवित असल्यामुळे दलालांनी तिकीटांचे दर वाढविले आहे.मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यत आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आॅक्टोंबरमध्ये मिळणाऱ्या रेल्वे आरक्षण तिकीटांसाठी दलालांच्या मर्जीनुसार रक्कम मोजली जात आहे. एकिकडे प्रवाशांची आर्थिक लूट चालली असताना रेल्वे प्रशासन मूकपणे हे सर्व बघत आहे. या प्रकाराला रेल्वे प्रशासन जबाबदार असून रेल्वे पोलिसांचे दलालांशी लागेबांधे आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)