शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

समृद्धि कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधार

By admin | Updated: August 25, 2016 00:12 IST

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा....

बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शनधामणगाव रेल्वे : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे़ भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापदादा अडसड यांनी शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली असून धामणगाव मतदारसंघात बैठकींना वेग आला आहे़मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे तयार करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी व प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू व्हावे, या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी झाडा, झाडगाव, आष्टा, चिंचोली या गावातील संबंधित शेतकऱ्यांची बैठक पंचायत समिती भवनात घेतली़ बैठकीला उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ सन २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीच्या शासकीय भावानुसार पावणेचार पट मोबदला किंंवा भागीदारी पद्धतीमध्ये सहभागी झाल्यास भूखंड व दहा वर्षांपर्यंत शेतजमिनी प्रमाणेमोबदला असे पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत.विशेषत: आपल्याकडे सद्यस्थितीत असलेली शेतजमीन शेतकऱ्यांना विकण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र, भागिदारी पद्धत ही शेतकऱ्यांचे जीवन उंचविणारी आहे. मौजाप्रमाणे मूल्यांकन काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांना सर्व बाबींची माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या बैठकीत सांगितले़धामणगाव मतदार संघातील नांदगाव खंडेश्वर व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी नऊ व धामणगाव तालुक्यातील पंधरा गावांतून हा प्रकल्प जाणार असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती मिळावी व प्रकल्पाचे काम गतीने सुरू व्हावे, याकरीता धामणगावसह चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर या दोन्ही तालुक्यांत बैठकी लावण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)