शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

शाळांच्या आवारात होणार ‘आधार’ नोंदणी

By admin | Updated: June 16, 2016 00:37 IST

आधार नोंदणीचे शतप्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी आता शाळांच्या आवारात विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना ...

शासनाचे आदेश : ५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी अमरावती : आधार नोंदणीचे शतप्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी आता शाळांच्या आवारात विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ५ ते १८ या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहेत.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात १३ जूनला विशेष परिपत्रक काढले आहे. राज्यातील ५ ते १८ वयोगटातील मुलांचे आधार नोंदणी करणे आवश्यक असून त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शिक्षण विभागातील उच्चपदस्थांना देण्यात आल्या आहेत.३० एप्रिल २०१६ पर्यंत ८२.८ टक्के मुलांचे आधारकार्ड नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणीसाठी शाळांच्या आवारात कॅम्प घेण्याच्या सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत. याकरिता ‘युएडीएआय’ तांत्रिक मदत करणार आहे. शासनातर्फे आधार नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे त्यासाठी ठिकठिकाणी आधार नोंदणी केंद्रदेखील उभारण्यात आले आहेत. परंतु तरीही अनेक मुले-मुली आधार नोंदणीपासून वंचित असल्याने आता शाळांमधूनच आधार नोंदणी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे आधार नोंदणीसाठी वेगळी जनजागृती करण्याची गरज उरणार नाही. या नोंदणीच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून शाळा-शाळांमध्ये आधार नोंदणी प्रक्रिया केली जाईल. (प्रतिनिधी)शिक्षण आयुक्तांवर जबाबदारीशतप्रतिशत आधार नोंदणी करण्यासाठी व त्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हाधिकारी व उपायुक्तांना सूचना देऊन आधार नोंदणीचे काम प्रभावीपणे करण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्तांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.९० टक्के नोंदणी आवश्यक५ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील तीन महिन्यात कमीत कमी ९० टक्के आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. उन्हाळ्यात सुटीत एक व शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित कॅम्प घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी व उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.