शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बासलापूरचा ‘मोबाइल वॉटरमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:33 IST

तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो.

ठळक मुद्देइंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद : महाराष्ट्रातून एकमेव, २० वर्षांपासून तहानलेल्यांची भागवितात तृष्णा

प्रभाकरराव भगोले।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. गेल्या २० वर्षांपासून हे काम तो अखंड करीत आहे. त्याच्या या कार्याची इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यावर्षीच्या नोंदीसाठी तो महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याचे समजते. विवेक ऊर्फ राजू वासुदेवराव चर्जन (रा. बासलापूर, ता. चांदूर रेल्वे) हे ते वॉटरमॅन असून, अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामे आटोपून दुपारी घर गाठायचे, अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचे ते तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी, हा विवेक चर्जन यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे. त्यांच्याकडील चार पिशव्या आणि २० बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात आणि त्या दुचाकीला बांधून बाहेर पडतात. जवळपास किमान ३० किलोमीटर ते दररोज नक्कीच फिरतात. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात. त्यांच्या या कामामुळे विवेक चर्चन या भागात 'मोबाइल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात. कोणत्याही ऋतूची पर्वा न करता तापत्या उन्हात पाणी वाटपाचे काम ते करतात. झाडाखाली जरा वेळ थांबलेल्या मजुरांना ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. विशेष म्हणजे, यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही. महागाईच्या काळात त्यांच्या दुचाकीच्या पेट्रोलचे पैसेदेखील आपल्याच खिशातून देतात. कुणाकडूनही ते पैसै स्वीकारत नाहीत. तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या व्यक्तीला पाणी हे सलाइनसारखे कार्य करते आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखे वाटते, असे विवेक चर्जन सांगतात. ते पक्ष्यांसाठीसुद्धा जलदूत ठरले आहेत.अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर दर किलोमीटर अंतरावर पक्ष्यांसाठी झाडावर त्यांनी पाण्याची सोय केली आहे. फांदीला ही जलपात्रे बांधून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाहीत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतीच इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया बूक आॅफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र, शिल्ड व पुस्तक विवेक चर्जन यांना प्राप्त झाले आहे. या रेकॉर्डसाठी यावर्षी ते महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Waterपाणी