शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

बासलापूरचा ‘मोबाइल वॉटरमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:33 IST

तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो.

ठळक मुद्देइंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद : महाराष्ट्रातून एकमेव, २० वर्षांपासून तहानलेल्यांची भागवितात तृष्णा

प्रभाकरराव भगोले।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. गेल्या २० वर्षांपासून हे काम तो अखंड करीत आहे. त्याच्या या कार्याची इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यावर्षीच्या नोंदीसाठी तो महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याचे समजते. विवेक ऊर्फ राजू वासुदेवराव चर्जन (रा. बासलापूर, ता. चांदूर रेल्वे) हे ते वॉटरमॅन असून, अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामे आटोपून दुपारी घर गाठायचे, अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचे ते तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी, हा विवेक चर्जन यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे. त्यांच्याकडील चार पिशव्या आणि २० बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात आणि त्या दुचाकीला बांधून बाहेर पडतात. जवळपास किमान ३० किलोमीटर ते दररोज नक्कीच फिरतात. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात. त्यांच्या या कामामुळे विवेक चर्चन या भागात 'मोबाइल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात. कोणत्याही ऋतूची पर्वा न करता तापत्या उन्हात पाणी वाटपाचे काम ते करतात. झाडाखाली जरा वेळ थांबलेल्या मजुरांना ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. विशेष म्हणजे, यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही. महागाईच्या काळात त्यांच्या दुचाकीच्या पेट्रोलचे पैसेदेखील आपल्याच खिशातून देतात. कुणाकडूनही ते पैसै स्वीकारत नाहीत. तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या व्यक्तीला पाणी हे सलाइनसारखे कार्य करते आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखे वाटते, असे विवेक चर्जन सांगतात. ते पक्ष्यांसाठीसुद्धा जलदूत ठरले आहेत.अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर दर किलोमीटर अंतरावर पक्ष्यांसाठी झाडावर त्यांनी पाण्याची सोय केली आहे. फांदीला ही जलपात्रे बांधून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाहीत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतीच इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया बूक आॅफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र, शिल्ड व पुस्तक विवेक चर्जन यांना प्राप्त झाले आहे. या रेकॉर्डसाठी यावर्षी ते महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Waterपाणी