शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी चारनंतरही बार सुरूच! छुप्या मार्गाने दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

नागरिक त्रस्त : पोलिसांचे दुर्लक्ष (रियालिटी) अमरावती : दुपारी ४ नंतर कुणीही दुकाने, प्रतिष्ठाने, बीअर बार बंद ठेवण्याचे आदेश ...

नागरिक त्रस्त : पोलिसांचे दुर्लक्ष (रियालिटी)

अमरावती : दुपारी ४ नंतर कुणीही दुकाने, प्रतिष्ठाने, बीअर बार बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही बारवर थेट दुपारी ४ नंतरही दारूविक्री होत असल्याचे वास्तव आहे. काही बारवर बाहेरून फाटक बंद राहते, तर छुप्या मार्गाने दारूविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू राहत असल्याने कोरोनात या भागातील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहे. पोलिसांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ‘लोकमत’ने रविवार दुपारी ४ ते ७ वाजता दरम्यान रियालिटी चेक केले असता, दारूविक्री होत असल्याचे पुढे आले.

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील जलसा बारचे बाहेरून दार बंद होते. मात्र, एका गल्लीतून या बाराचा दरवाजा उघडा राहत असल्याचे नेहमीप्रमाणे आढळले. या ठिकाणी आतून दारूविक्री होते. रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपींचा वावर असतोे. त्यामुळे या भागातील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत.

शहर कोतवाली ठाणे हद्दीतील जयस्तंभ चौक स्थित हॉटेल रेस्टॉरेंट अँड बारचा दरवाजा दुपारी ५ वाजताच्या सुमारस उघडा होता. अशीच परिस्थिती राजापेठ हद्दीतील हॉटेल राज प्लाझा येथेही आढळली. दरवाजा उघडा होता. काही लोकांचा वावर होता. शनिवारी-रविवारी वीकेंड लॉकडाऊन असतानाही रविवारी जर अशा प्रकारे बार दुपारी ४ नंतरही सुरू राहत असतील व दारूची सर्रास विक्री होत असेल, तर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन नव्हे का? दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असलेल्या बार व हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे नोंदविले, हे विशेष!

कोट

आम्ही कॉलनीतील नागरिक जलसा बारमुळे त्रस्त आहोत. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी दारूविक्री होत असल्याने येथे मद्यपींचा वावर असतो. येथेच पार्सल विकत घेऊन दारू ढोसली जाते.

एक नागरिक

कोट

अर्जुननगर

अर्जननगरनजीक नागपूर मार्गावरच जलसा बार आहे. आधी मद्यपींचा वावर समोरून होता. मात्र, कोरोनामुळे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. नागरिकांचा वावर कॉलनीतील गल्लीतून असतो. येथून दोन किमी अंतरावर गाडगेनगर ठाणे आहे.

जयस्तंभ चौक

येथूनच हाकेच्या अंतरावरच सिटी कोतवाली ठाणे आहे. मुख्य मार्केट आहे. नियमांचे उल्लघंन केल्यास साधारण नागरिकांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारतात. मात्र, ४ नंतरही येथील बारचा दरवाजा उघडा ठेवला जात असला तरी कारवाई केली जात नाही.

राजापेठ

राजापेठच्या रेल्वे अंडरपासच्या पुढेच कंवरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर बार आहे. दुपारी ४ नंतरसुद्धा या बारचे प्रवेशद्वार उघडे होते. मात्र, कारवाई करण्याची तजवीज पोलीस करीत नाहीत.

सीपींचा कोट आहे.