शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बियाणी चौकामागील झुडपांनी घेतला पेट

By admin | Updated: April 15, 2017 00:06 IST

बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

दोन एकरात पसरली आग : आग विझविण्यासाठी डीसीपींचा धाडसी पुढाकारअमरावती : बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. परिसरात साचलेल्या केरकचऱ्याने व वाळलेल्या झडुपांनी पेट घेतल्याने ही आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, आग रौद्ररूप धारण करीत असल्याचे पाहून पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी आगीच्या वेढ्यात शिरून स्वत: आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तब्बल २ एकरांत ही आग पसरली होती. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेमागील परिसरात झाडेझुडुपी वाढली आहेत. या बँकेच्या संरक्षण भिंतीजवळ अनेक लोक कचरा गोळा करतात. परिसरात आगी लागल्याच्या घटना बहुधा घडल्यात. शुक्रवारी दुपारी १२ वाजता या कचऱ्याने अचानक पेट घेतला. काही वेळातच आग पसरू लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तासाभरानंतरही आग आटोक्यात येईना. वाऱ्यामुळे आगीचा विस्तार वाढतच होता. याच परिसरात काही अंतरावर महापौर बंगला व शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. आग त्यादिशेने सरकत असल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तातडीने याची दखल घेत काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. आग निवासस्थानांपर्यंत पोहोचल्यास तेथील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्यात. दरम्यान पोलीस उपायुक्त मीना यांनी आगीचा वाढता प्रकोप लक्षात घेता तातडीने अग्निशमन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वत: आगीच्या वेढ्यात शिरून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. डीसीपी शशीकुमार मीना यांच्या या कर्तव्यतत्परतेची परिसरात चर्चा होती. (प्रतिनिधी)पोलीस, अग्निशमन विभागाची मोलाची कामगिरीपोलीस यंत्रणेतील सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे, गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्यासह मोठा पोलीस ताफा आग नियंत्रणासाठी एकत्र आला होता. डोंगरदिवे यांनी झुडुंपांमध्ये प्रवेश करून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. अग्निशमनचे प्रभारी अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात फायरमन प्रेमानंद सोनकांबळे, विलास गोमेकर, सैय्यद अनवर, राजेश गजभे, अतुल कपल, राजेश अलोडे, निखील भाटे, ड्युटी इनचार्ज मच्छिंद्र यादव, चालक राजेंद्र लोणारे, सोहेब खान, राजेश अलोडे यांनी तब्बल दीड तासांत सहा पाण्याच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले.