शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांच्या ठेवी काढणार

By admin | Updated: July 5, 2015 00:23 IST

जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांना देण्यात आलेले पीककर्ज व रुपांतरण कर्जाचे उद्दिष्ट १० जुलैपर्यंत पूर्ण करावे,

आढावा बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवी काढून घेण्याचे दिले निर्देशअमरावती : जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांना देण्यात आलेले पीककर्ज व रुपांतरण कर्जाचे उद्दिष्ट १० जुलैपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या किंवा शेतकऱ्यांना पीककर्ज व पीककर्जाचे रुपांतरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांमधील शासकीय योजनांच्या ठेवी काढून घेण्यात येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली बँकांची पीककर्ज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात दोन लाख २१ हजार ९४८ खातेदारांना १६९५ कोटी ४४ लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.३ जुलै अखेर एक लाख १९ हजार ३८२ खातेदारांना एक हजार कोटी ३६ लक्ष रुपयांचे म्हणजे ५९ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील ४५ हजार १९६ खातेदार ४०३ कोटी २१ लक्ष रुपये पीककर्ज रुपांतरणासाठी पात्र असताना या तारखेअखेर ३५ हजार ५१२ खातेदारांना २८७ कोटी १५ लक्ष म्हणजे ७१ टक्के पीककर्ज रुपांतरण झाले आहे. ज्या-ज्या बँकांचे उद्दिष्ट कमी आहे. त्या बँकांच्या प्रमुखाने सर्व शाखा बँकांचा आढावा घ्यावा. ज्या बँकांची कामगिरी निराशजनक आहे अशा सर्व बँकांना भादंविच्या कलम १८८ अंतर्गत नोटीस जारी केल्या जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.नवीन उघडलेल्या शाखांना नावलौकिकासाठी अद्यापही संधी आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया व बँक आॅफ महाराष्ट्र यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. गेल्यावर्षी ३० जून २०१४ अखेर वाणिज्य बँक ३० टक्के तर सहकारी बँक ६२ टक्के एकूण ४१ टक्के तर यावर्षी ३० जून २०१५ अखेर वाणिज्य बँक ६१ टक्के तर सहकारी बँका ५८ टक्के असे एकूण ६० टक्के कर्जवाटप केले आहे. आतापर्यंत या संदर्भात आठ बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.