शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कर्ज देण्यास बँकांची ना

By admin | Updated: June 18, 2017 00:06 IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, ...

अंकुश कुणाचा ? : थकीत कर्जाबाबत शासनाने मागविला अहवाललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, म्हणून थकीत शेतकऱ्यांना १० हजार रूपये देण्याचे आदेश सर्वच बँकांना गुरूवारी देण्यात आले. मात्र, बँकांद्वारा हे आदेश बासनात गुंडाळले आहे. आम्हाला अद्याप आदेश प्राप्त नाही, असे सांगत बँका शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे.शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद म्हणून शासन व सुकाणू समितीच्या बैठकीत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. पहिल्या बैठकीत शासनाने अल्पभूधारकांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतरच्या बैठकीत सर्व थकीत शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच्या निर्णयाला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली. या पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत अडचणीत व थकबाकीदार शेतकऱ्यांना कोऱ्या कागदावर शपथपत्र घेऊन १० हजारांची मदत बँकांव्दारा देण्याविषयीचा निर्णय झाला. २५ जुलैपूर्वी शासन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेणार आहे. याचअनुषंगाने सहकार विभागाला थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज व विविध दिनांकाला असलेली थकबाकी याचे विवरण मागितले आहे. याची पडताळणी करून शासनाव्दारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार आहे.यंदाच्या खरीप हंगामात कर्ज मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहाय्य व्हावे, यासाठी तातडीचे १० हजारांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी बँकाव्दारा मात्र शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवून माघारी पाठवीत आहे. त्यामुळे शासनादेश धुडकावून लावणाऱ्या या बँकांवर अंकुश कुणाचा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.वास्तविक पाहता शेतकऱ्यांना पीककर्ज सोसायट्यांद्वारा देण्यात येते. सभासद असणाऱ्या सोसायट्यांमार्फत जिल्हा बँकेचा हा कर्जवाटपाचा व्यवहार सुरू असतो. आता बँकांद्वारा तातडीने १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश शासनाने दिले असून हमी घेतली आहे. मात्र शेतकऱ्यांना सोसायट्यांव्दारा कर्ज उपलब्ध होत असल्याने व सोसायट्यांच्या कर्जाला शासन हमी नसल्याने तूर्तास गोंधळ सुरू आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख शेतकरी कर्जदारजिल्ह्यात ४,१५,८५८ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ३,९८,६०१ सभासद आहेत. यामध्ये ३,३३,१९७ शेतकरी कर्जदार आहेत. जिल्हा बँकेचे ९३,१९० राष्ट्रीयीकृत बँकांचे १,३१,०९१ व ग्रामीण बँकांचे १,९८४ शेतकरी कर्जदार आहेत. शासनाने एक ते दोन लाखांपर्यंत थकीत शेतकऱ्यांच्या कर्जाचे विवरण मागितल्याची माहिती आहे.जुन्या नोटांचा कर्ज वाटपास अडसरजिल्हा सहकारी बँकेकडे जवळपास ७० कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. आरबीआयव्दारा या नोटा बदलवून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नव्याने कर्ज वाटपास बँकेला अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल्याने आहे त्या स्थितीत जिल्हा बँकेव्दारा आतापर्यंत लक्ष्यांकाच्या ३५ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.