शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बँकानी झुगारली जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:07 IST

जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती.

१,२८६ कोटींचे वाटप बाकी : १२ दिवसांत दोन टक्काच कर्जवाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती. मात्र, त्यानंतर १२ दिवसांत जिल्ह्यातील बँकांनी कर्जवाटपात केवळ दोन टक्केच प्रगती केल्याने बँकानी तंबी झुगारल्याची बाब स्पष्ट झाली आहे. बँकाच्या असहयोगामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.खरिपात जिल्ह्यातील बँकांना एक हजार ५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक असताना बँकांद्वारा सद्यस्थितीत ३० हजार १४३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही केवळ १९ टक्केवारी आहे. बँकानी अद्याप एक हजार २८६ कोटी १४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकाची ना आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सुद्धा बँका टाळाटाळ करीत असून जिल्हा बँकर्सच्या बैठकीत बँकांनी २७ हजार शेतकऱ्यांना २७० कोटी १७ लाखांचे वाटप केले होते. ही टक्केवारी १७ टक्के इतकी होती. केवळ १२ दिवसांत त्यात दोन टक्केच भर पडली.तूर्तास राष्ट्रीयीकृत बँकांव्दारा ११ हजार ४१३ शेतकऱ्यांना १३३ कोटी ७१ हजारांचे वाटप केले आहे. ही टक्केवारी १३ टक्के आहे. ग्रामीण बँकांनी २४२ शेतकऱ्यांना एक कोटी ९१ लाख रूपयांचे वाटप केले आहे. ही टक्केवारी १३ टक्के आहे तर जिल्हा बँकेने १८ हजार ४८८ शेतकऱ्यांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँकाच्या या धोरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.जिल्हा बँकेचे वाटप ३३ टक्क्यांवर स्थिरावलेयंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेला ८८ हजार ८९० शेतकऱ्यांना ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक दिला होता. प्रत्यक्षात या बँकेने १८ हजार ४८८ शेतकरी खातेदारांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. एप्रिल, मे व जून महिन्याच्या सुरूवातीला कर्जवाटप केल्यानंतर गेल्या महिन्याभरात याबँकेच्या वाटपाचा टक्का ‘जैसे थे’आहे.राष्ट्रीयीकृत बँकाचा टक्का वाढेनाजिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाना यंदा खरिपासाठी १,०२६ कोटींच्या कर्ज वाटपाचा लक्ष्यांक असताना अद्याप १३३ कोटींचे कर्जवाटप केले आहे.यामध्ये एसबीआयने केवळ १२ टक्के, सेंट्रल बँकेने ११ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. शासन प्रशासनाला न जुमानता या बँकांनी शेतकऱ्यांप्रती असहकार्याचे धोरण कायम ठेवले आहे.