शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

बँकानी झुगारली जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:07 IST

जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती.

१,२८६ कोटींचे वाटप बाकी : १२ दिवसांत दोन टक्काच कर्जवाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती. मात्र, त्यानंतर १२ दिवसांत जिल्ह्यातील बँकांनी कर्जवाटपात केवळ दोन टक्केच प्रगती केल्याने बँकानी तंबी झुगारल्याची बाब स्पष्ट झाली आहे. बँकाच्या असहयोगामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.खरिपात जिल्ह्यातील बँकांना एक हजार ५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक असताना बँकांद्वारा सद्यस्थितीत ३० हजार १४३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही केवळ १९ टक्केवारी आहे. बँकानी अद्याप एक हजार २८६ कोटी १४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकाची ना आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सुद्धा बँका टाळाटाळ करीत असून जिल्हा बँकर्सच्या बैठकीत बँकांनी २७ हजार शेतकऱ्यांना २७० कोटी १७ लाखांचे वाटप केले होते. ही टक्केवारी १७ टक्के इतकी होती. केवळ १२ दिवसांत त्यात दोन टक्केच भर पडली.तूर्तास राष्ट्रीयीकृत बँकांव्दारा ११ हजार ४१३ शेतकऱ्यांना १३३ कोटी ७१ हजारांचे वाटप केले आहे. ही टक्केवारी १३ टक्के आहे. ग्रामीण बँकांनी २४२ शेतकऱ्यांना एक कोटी ९१ लाख रूपयांचे वाटप केले आहे. ही टक्केवारी १३ टक्के आहे तर जिल्हा बँकेने १८ हजार ४८८ शेतकऱ्यांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँकाच्या या धोरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.जिल्हा बँकेचे वाटप ३३ टक्क्यांवर स्थिरावलेयंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेला ८८ हजार ८९० शेतकऱ्यांना ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक दिला होता. प्रत्यक्षात या बँकेने १८ हजार ४८८ शेतकरी खातेदारांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. एप्रिल, मे व जून महिन्याच्या सुरूवातीला कर्जवाटप केल्यानंतर गेल्या महिन्याभरात याबँकेच्या वाटपाचा टक्का ‘जैसे थे’आहे.राष्ट्रीयीकृत बँकाचा टक्का वाढेनाजिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाना यंदा खरिपासाठी १,०२६ कोटींच्या कर्ज वाटपाचा लक्ष्यांक असताना अद्याप १३३ कोटींचे कर्जवाटप केले आहे.यामध्ये एसबीआयने केवळ १२ टक्के, सेंट्रल बँकेने ११ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. शासन प्रशासनाला न जुमानता या बँकांनी शेतकऱ्यांप्रती असहकार्याचे धोरण कायम ठेवले आहे.