शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षापेक्षा थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकेचा नकार

By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST

एक वर्षापेक्षा थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकांनी नकार दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती पडीक राहिली आहे.

अन्याय : कोरडवाहू शेतकरी अडकले चक्रव्यूहातचांदूरबाजार : एक वर्षापेक्षा थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकांनी नकार दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती पडीक राहिली आहे.शासनाच्या कर्जाच्या पुनर्गठन घोषणेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र जेव्हा हे शेतकरी थकीत कर्जाच्या पुनर्गठनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत गेले तेव्हा तुम्ही शासनाच्या ‘जी.आर.’ नियमात बसत नसल्यामुळे तुम्हाला नविन कर्ज मिळणार नाही म्हणून बँकेतून परतविले. याचा फटका येथील संजय राऊत या शेतकऱ्यालाच बसला असे नाही तर विदर्भातील ८५ टक्के कोरडवाहू शेतकरी या शासनाच्या भुलभूलैया ‘जीआर’ च्या घरीच्या ‘चक्रव्यूहात’ अडकले आहेत. त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या राऊत यांनी थेट मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवून आत्महत्येची पाळी आणू नका, असा इशारा दिला आहे.संजय राऊत यांची मिर्झापूर येथे १ हेक्टर ७४ आर शेती आहे. या शेतावर त्यांनी २००९-१० या वर्षात खरीप पिकासाठी कर्ज घेतले. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. दुर्दैवाने याच काळात त्यांच्या पत्नीचा अपघात झाला. यात त्यांच्या पत्नीचे दागिनेसुध्दा विकावे लागले. शासनच्या पुनर्गठन घोषणेमुळे राऊत यांच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या मात्र, त्या फार काळ टिकू शकल्या नाहीत. स्थानिक स्टेट बँकेने त्याचे एक वर्षापेक्षा अधिक काळाचे कर्ज पुनर्गठन करण्यास नकार दिला व नवीन कर्जाचाही अर्ज बंद केला असल्याने संताप व्यक्त होत आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे दरवर्षी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले नाही तर पुढेही हेच घडत राहणार. ६० लाखांची शेती गहाण ठेवणाऱ्या शेतकऱ्याची १० लाखांची पत नसावी यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते कोणते? - राजाभाऊ देशमुख, शेतकरी, गणोजा.