शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:02 IST

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय ! वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ...

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय !

वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामनेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत, तर काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याने पुन्हा मतदारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्तरावरील निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला राहणार असल्याचे संकेत आहेत.

मतदान १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १३९ प्रभागांकरिता १५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याअनुषंगाने ग्रामीण राजकारण तापायला सुरुवात झाली असली तरी सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याने उत्साह घटला आहे.

मतभेद चव्हाट्यावर

तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यात सत्ता काबीज करण्यास यश मिळविले असले तरी मात्र ग्रामीण राजकारणात हेवेदावे, मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. गावनेत्यांना एकमेकांचे वर्चस्व सहन होत नाही. यामुळे काहींनी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. पॅनेलआडून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण असले तरी काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती आहे. एकीकडे केवळ सत्ता काबीज करण्याकरिता एकत्र येऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि गावपातळीवरच्या राजकारणात वैयक्तिक मत मागणे हा जगावेगळा कारभार राजकारण्यांनी सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

चुलीपासूनच्या राजकारणाला सुरुवात

गावपातळीवरचे नेते सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही गावात सख्खे भाऊ, तर कुठे उमेदवार मिळाला नाही म्हणून घरी काम करणाऱ्या माणसाला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीवर आपले राज्य हवे म्हणून सरपंच घरचाच असावा, याकरिता काही लोकप्रतिनिधींनी आपल्या जोडीदारांनासुद्धा निवडणुकीत उभे केल्याची चर्चा आहे.

भाजपचे युवा नेते भूमिगत?

भाजपचे युवा नेते आपले उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवून पक्षाला घरचा आहेर दिला आणि भूमिगत झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या राजकीय मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहेत. यामुळे वरूड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगणार असून, जिल्हास्तरावर एकाच राजकीय पक्षासाठी काम करणारे दोन गावपुढारी एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. त्यातच सदस्य व सरपंचपदाकरिता सातवा वर्ग उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेक जुन्या जाणत्यांना गावातील राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे.

------------------------------