शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:02 IST

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय ! वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ...

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय !

वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामनेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत, तर काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याने पुन्हा मतदारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्तरावरील निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला राहणार असल्याचे संकेत आहेत.

मतदान १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १३९ प्रभागांकरिता १५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याअनुषंगाने ग्रामीण राजकारण तापायला सुरुवात झाली असली तरी सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याने उत्साह घटला आहे.

मतभेद चव्हाट्यावर

तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यात सत्ता काबीज करण्यास यश मिळविले असले तरी मात्र ग्रामीण राजकारणात हेवेदावे, मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. गावनेत्यांना एकमेकांचे वर्चस्व सहन होत नाही. यामुळे काहींनी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. पॅनेलआडून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण असले तरी काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती आहे. एकीकडे केवळ सत्ता काबीज करण्याकरिता एकत्र येऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि गावपातळीवरच्या राजकारणात वैयक्तिक मत मागणे हा जगावेगळा कारभार राजकारण्यांनी सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

चुलीपासूनच्या राजकारणाला सुरुवात

गावपातळीवरचे नेते सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही गावात सख्खे भाऊ, तर कुठे उमेदवार मिळाला नाही म्हणून घरी काम करणाऱ्या माणसाला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीवर आपले राज्य हवे म्हणून सरपंच घरचाच असावा, याकरिता काही लोकप्रतिनिधींनी आपल्या जोडीदारांनासुद्धा निवडणुकीत उभे केल्याची चर्चा आहे.

भाजपचे युवा नेते भूमिगत?

भाजपचे युवा नेते आपले उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवून पक्षाला घरचा आहेर दिला आणि भूमिगत झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या राजकीय मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहेत. यामुळे वरूड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगणार असून, जिल्हास्तरावर एकाच राजकीय पक्षासाठी काम करणारे दोन गावपुढारी एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. त्यातच सदस्य व सरपंचपदाकरिता सातवा वर्ग उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेक जुन्या जाणत्यांना गावातील राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे.

------------------------------