शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:02 IST

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय ! वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ...

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय !

वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामनेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत, तर काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याने पुन्हा मतदारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्तरावरील निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला राहणार असल्याचे संकेत आहेत.

मतदान १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १३९ प्रभागांकरिता १५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याअनुषंगाने ग्रामीण राजकारण तापायला सुरुवात झाली असली तरी सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याने उत्साह घटला आहे.

मतभेद चव्हाट्यावर

तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यात सत्ता काबीज करण्यास यश मिळविले असले तरी मात्र ग्रामीण राजकारणात हेवेदावे, मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. गावनेत्यांना एकमेकांचे वर्चस्व सहन होत नाही. यामुळे काहींनी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. पॅनेलआडून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण असले तरी काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती आहे. एकीकडे केवळ सत्ता काबीज करण्याकरिता एकत्र येऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि गावपातळीवरच्या राजकारणात वैयक्तिक मत मागणे हा जगावेगळा कारभार राजकारण्यांनी सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

चुलीपासूनच्या राजकारणाला सुरुवात

गावपातळीवरचे नेते सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही गावात सख्खे भाऊ, तर कुठे उमेदवार मिळाला नाही म्हणून घरी काम करणाऱ्या माणसाला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीवर आपले राज्य हवे म्हणून सरपंच घरचाच असावा, याकरिता काही लोकप्रतिनिधींनी आपल्या जोडीदारांनासुद्धा निवडणुकीत उभे केल्याची चर्चा आहे.

भाजपचे युवा नेते भूमिगत?

भाजपचे युवा नेते आपले उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवून पक्षाला घरचा आहेर दिला आणि भूमिगत झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या राजकीय मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहेत. यामुळे वरूड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगणार असून, जिल्हास्तरावर एकाच राजकीय पक्षासाठी काम करणारे दोन गावपुढारी एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. त्यातच सदस्य व सरपंचपदाकरिता सातवा वर्ग उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेक जुन्या जाणत्यांना गावातील राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे.

------------------------------