शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

बीटी बियाणांच्या विक्रीला १ जूनपर्यंत प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:05 IST

अमरावती : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा ...

अमरावती : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तसे आदेश ३० एप्रिलला बजावले आहेत.

जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रकोप खरीप २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर कृषी विभागाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे सन २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी आढळून आला. त्यातुलनेत ऑगस्टपश्चात दोन महिने झालेल्या परतीच्या पावसामुळे कपाशीवर बोंडसडचा जास्त प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, याकरिता आतापासूनच उपाययोजना प्रस्तावित केल्या जात आहेत.

कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगण्यात आले. कपाशीची हंगामपूर्व पेरणी झाल्यास बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होणार नाही. याउलट पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक प्रभावी उपाययोजना म्हणून यंदा हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणेच उपलब्ध होऊ न दिल्यास हंगामपूर्व लागवड टाळता येऊ शकते. त्यामुळेच १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियमात २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

पाॅइंटर

असे आहेत निर्देश

उत्पादक ते कंपनी वितरक : १० मे पासून पुढे

वितरक ते किरकोळ विक्रेता : १५ मे पासून पुढे

किरकोळ विक्रेता ते शेतकरी : १ जूनपासून पुढे

बॉक्स

किमान पाच हजार हेक्टरमध्ये हंगामपूर्व कपाशी

जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कपाशीची किमान पाच हजार हेक्टरमध्ये लागवड होते, ती यंदाच्या हंगामात होऊ नये यासाठी कृषी विभागाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यंदा भूजल पातळी समाधानकारक असल्याने विहिरीतील पाण्याची पातळीदेखील चांगली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी १ जूननंतर पेरणीच्या तयारीत आहेत.

बॉक्स

यंदा १२.५८ लाख बियाणे पाकिटांची मागणी

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात किमान २,५१,४५२ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सहा हजार हेक्टरने जास्त आहे. यासाठी यंदा बीजी-२ च्या किमान १२,५७,७१० पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये ४५० ग्रॅमच्या एका पाकिटाची किंमत ७६७ रुपये केंद्रीय कृषी मंत्रालयाने निश्चित केली आहे. यामध्ये १२० ग्रॅम रेफ्युजी बियाणे राहणार आहे.