शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरातील बालाजीनगर पाण्यात, रात्र काढली जागून, मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. ...

बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. पहाटेपासूनच संबंधित यंत्रणा पाणी मोकळे करण्याच्या कामात लागली होती. नाल्याचे पाणी वस्तीसह शेतांमध्येदेखील शिरल्याने मोठे नुकसान झाले.

नव्या वस्तीच्या झिरी मंदिरापासून जवळच यवतमाळ महामार्गालगत बालाजीनगर परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. परिसरातील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे याभागातील लोकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील लोकांच्या मते, एक्सप्रेस हायवेच्या उड्डाणपुलाखाली एका ठिकाणी नाला चोक झाल्यामुळे पावसाचे पाणी वस्तीकडे वळले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाला ओव्हर फ्लो झाल्याने त्याचेदेखील पाणी वस्तीत शिरल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या नाल्याला कोंडेश्वराहून पाणी येते. साचलेल्या पाण्यामुळे सिमेंट, रेती, सेंट्रिंग, वाहने, घरातील महत्त्वाच्या वस्तू यांचे नुकसान झाले. नाल्यालगतच्या एका शेतातील जनावरांना रात्रभर पाण्यातच राहावे लागले. या परिसरात घरांचे बांधकाम सुरू आहे.

पहाटे रेस्क्यू पथकाद्वारे वस्तीतील पाणी काढण्याचे काम सुरू झाले. मनपाचे उपायुक्त, झोन अभियंता तसेच भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेविका अर्चना धामणे, किशोर जाधव, राजू देवडा, बंडू धामणे, योगेश निमकर यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीसाठी मोठ्या संख्येत जमले होते. दुपारी १२ पर्यंत नागरिकांना अडकून राहावे लागले. नेमके एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये पाणी का शिरले, याचे कारण प्रशासनाला शोधून काढावे लागेल. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुन्हा असे झाल्यास याला कोण जबाबदार राहील, असेही बोलले जात होते.

^^^^^^^^^^^^--^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रेल्वे स्थानक परिसरात गुडघ्याएवढे पाणी

रात्रीच्या जोरदार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात साचले होते. त्याचप्रमाणे तिकीट बूकिंग कार्यालयासमोरदेखील पाणी साचले. रेल्वे पोलीस ठाणे तसेच सी.से. इंजिनीयर कार्यालय परिसरात पाणी साचले. साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जास्त पाऊस झाल्यास रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे पाणी साचते. मात्र, संबंधित विभाग केवळ वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्याचे एकंदर स्थितीवरून समोर आले आहे.