शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

बडनेरातील बालाजीनगर पाण्यात, रात्र काढली जागून, मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. ...

बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. पहाटेपासूनच संबंधित यंत्रणा पाणी मोकळे करण्याच्या कामात लागली होती. नाल्याचे पाणी वस्तीसह शेतांमध्येदेखील शिरल्याने मोठे नुकसान झाले.

नव्या वस्तीच्या झिरी मंदिरापासून जवळच यवतमाळ महामार्गालगत बालाजीनगर परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. परिसरातील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे याभागातील लोकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील लोकांच्या मते, एक्सप्रेस हायवेच्या उड्डाणपुलाखाली एका ठिकाणी नाला चोक झाल्यामुळे पावसाचे पाणी वस्तीकडे वळले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाला ओव्हर फ्लो झाल्याने त्याचेदेखील पाणी वस्तीत शिरल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या नाल्याला कोंडेश्वराहून पाणी येते. साचलेल्या पाण्यामुळे सिमेंट, रेती, सेंट्रिंग, वाहने, घरातील महत्त्वाच्या वस्तू यांचे नुकसान झाले. नाल्यालगतच्या एका शेतातील जनावरांना रात्रभर पाण्यातच राहावे लागले. या परिसरात घरांचे बांधकाम सुरू आहे.

पहाटे रेस्क्यू पथकाद्वारे वस्तीतील पाणी काढण्याचे काम सुरू झाले. मनपाचे उपायुक्त, झोन अभियंता तसेच भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेविका अर्चना धामणे, किशोर जाधव, राजू देवडा, बंडू धामणे, योगेश निमकर यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीसाठी मोठ्या संख्येत जमले होते. दुपारी १२ पर्यंत नागरिकांना अडकून राहावे लागले. नेमके एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये पाणी का शिरले, याचे कारण प्रशासनाला शोधून काढावे लागेल. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुन्हा असे झाल्यास याला कोण जबाबदार राहील, असेही बोलले जात होते.

^^^^^^^^^^^^--^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रेल्वे स्थानक परिसरात गुडघ्याएवढे पाणी

रात्रीच्या जोरदार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात साचले होते. त्याचप्रमाणे तिकीट बूकिंग कार्यालयासमोरदेखील पाणी साचले. रेल्वे पोलीस ठाणे तसेच सी.से. इंजिनीयर कार्यालय परिसरात पाणी साचले. साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जास्त पाऊस झाल्यास रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे पाणी साचते. मात्र, संबंधित विभाग केवळ वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्याचे एकंदर स्थितीवरून समोर आले आहे.