शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बहिरम ‘हाऊसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

बहिरमची यात्रा साधारणत: ३५० वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा तेथे थांबले होते. त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली.

ठळक मुद्दे३५० वर्षांचा इतिहास : दर्शनासाठी लागल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चांदूरबाजार : सध्या बहिरम यात्रा भरात आली आहे. या यात्रेला लोकसंस्कृतीत आगळे महत्त्व आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या यात्रेने १२ जानेवारीच्या रविवारी लाखोंची गर्दी अनुभवली. या गर्दीचे ‘मायला लेकरू भारी’ असे वर्णन केल्यास वावगे ठरणार नाही. रविवारची गर्दी व्यापारी, स्थानिकांना उभारी देणारी ठरली.बहिरमची यात्रा साधारणत: ३५० वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा तेथे थांबले होते. त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो, असे सांगितले. शंकराचे रुद्ररूप असलेले हे ठिकाण भैरवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे स्थळ बहिरम नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ठिकाणी शिव-पार्वतीने तीन दिवसांचा मुक्काम केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी दैवीशक्तीने खास काशीचे पाणी आणण्यात आले. त्या पाण्याचा इथला काशीतलाव प्रसिद्ध आहे. ज्या तलावातून पूर्वीच्या काळी भांडीकुंडी निघत होती, (ती भांडी घेतल्यानंतर ती परत करण्याची अट होती. काही व्यक्तींनी ती भांडी चोरून नेल्यामुळे तेथून भांडी येणे बंद झाल्याची आख्यायिका आहे.) तो भांडी तलावही येथे आहे; परंतु मृतावस्थेत आहे. येथे विश्वमित्र, कपिल ऋषींनी काही दिवस तप केल्याचेही सांगितले जाते, अशी ही पुरातन महत्त्व राखणारी ही बहिरम यात्रा जानेवारीच्या दुसºया आठवड्यात पूर्ण बहरावर आली आहे.