शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:17 IST

तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देपात्र कोरडेच : शासन उदासीन, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे. शासनाचा नाला खोलीकरण, शेततळे या योजनेअंतर्गत काशी तलावाचे पुनर्जीवन केल्यास इतिहासाची साक्ष देणाऱ्या तलावाचे वैभव वाचू शकते.सातपुड्याच्या कुशीत वसलेले लाखो कुटुंबांचे कुलदैवत बहिमरबुवा असून महाराष्ट्रासह परप्रांतीय भाविक या यात्रेत सहभागी होतात. भगवान शंकर व पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी निसर्गाच्या कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले होते. त्यामुळे पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच येथे ठेवतो, अशी आख्यायिका आहे. भगवान शंकराचे ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. पूर्वी हे तलाव भाविकांची तहाण भागवित होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.काशी तलावात ॠ षींचा मुक्कामसातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या पावसाच्या धारा या जंगलात असणाऱ्या वनऔषधीसोबतच येथील कशी तलावात पाणी जमा व्हायचे. काशीतलावाच्या चारही बाजूला सीताफळ, चंदनाचे मोठे वन आहे. अनेक वनऔषधीसुद्धा या जंगलात आढळतात. काशी तालवासंदर्भात पुराणातही दाखला मिळतो. ॠ षी विश्वामित्र, दुर्वासा व मार्तंड यांनी येथे तीन, सात व चार दिवस मुक्काम केला होता. आज या तलावात पाणी नसले तरीदेखील भाविकांच्या मनात तलावाविषयी श्रद्धा आहे.ब्रिटिशकाळात झाले संवर्धनयात्रेकरूंची तहान मागविणारा काशी तलावात आज पूर्णत: कोरडा पडला आहे. इंग्रजांना या तलावाचे महत्त्व पटल्याने ब्रिटिशकाळात या तलावाचे संवर्धन करण्यात आले. मात्र, इतिहासाची साक्ष असलेला हा काशी तलाव आजही उपेक्षितच आहे. चांदूर बाजारचे तत्कालीन गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी काशी तलावाला पुनर्जीवन देण्याचा निर्धार केला होता. या ठिकाणी पर्यटनाच्या हेतुने बोटिंग, मासेमारीसारखे अनेक उद्योग चांगल्या तºहेने सुरू करता येत असल्याची कल्पना मांडली होती.जिल्हा परिषदेने या ऐतिहासिक काशीतलावात नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यास निसर्गाच्या सानिध्यातील हा काशी तलाव मोठे पर्यटनस्थळ बनू शकतो. याकरिता लवकरच शासनस्तरावर मागणी करणार आहे.- नितीन टाकरखेडे, उपसभापती, पंचायत समिती