शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:17 IST

तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देपात्र कोरडेच : शासन उदासीन, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे. शासनाचा नाला खोलीकरण, शेततळे या योजनेअंतर्गत काशी तलावाचे पुनर्जीवन केल्यास इतिहासाची साक्ष देणाऱ्या तलावाचे वैभव वाचू शकते.सातपुड्याच्या कुशीत वसलेले लाखो कुटुंबांचे कुलदैवत बहिमरबुवा असून महाराष्ट्रासह परप्रांतीय भाविक या यात्रेत सहभागी होतात. भगवान शंकर व पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी निसर्गाच्या कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले होते. त्यामुळे पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच येथे ठेवतो, अशी आख्यायिका आहे. भगवान शंकराचे ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. पूर्वी हे तलाव भाविकांची तहाण भागवित होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.काशी तलावात ॠ षींचा मुक्कामसातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या पावसाच्या धारा या जंगलात असणाऱ्या वनऔषधीसोबतच येथील कशी तलावात पाणी जमा व्हायचे. काशीतलावाच्या चारही बाजूला सीताफळ, चंदनाचे मोठे वन आहे. अनेक वनऔषधीसुद्धा या जंगलात आढळतात. काशी तालवासंदर्भात पुराणातही दाखला मिळतो. ॠ षी विश्वामित्र, दुर्वासा व मार्तंड यांनी येथे तीन, सात व चार दिवस मुक्काम केला होता. आज या तलावात पाणी नसले तरीदेखील भाविकांच्या मनात तलावाविषयी श्रद्धा आहे.ब्रिटिशकाळात झाले संवर्धनयात्रेकरूंची तहान मागविणारा काशी तलावात आज पूर्णत: कोरडा पडला आहे. इंग्रजांना या तलावाचे महत्त्व पटल्याने ब्रिटिशकाळात या तलावाचे संवर्धन करण्यात आले. मात्र, इतिहासाची साक्ष असलेला हा काशी तलाव आजही उपेक्षितच आहे. चांदूर बाजारचे तत्कालीन गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी काशी तलावाला पुनर्जीवन देण्याचा निर्धार केला होता. या ठिकाणी पर्यटनाच्या हेतुने बोटिंग, मासेमारीसारखे अनेक उद्योग चांगल्या तºहेने सुरू करता येत असल्याची कल्पना मांडली होती.जिल्हा परिषदेने या ऐतिहासिक काशीतलावात नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यास निसर्गाच्या सानिध्यातील हा काशी तलाव मोठे पर्यटनस्थळ बनू शकतो. याकरिता लवकरच शासनस्तरावर मागणी करणार आहे.- नितीन टाकरखेडे, उपसभापती, पंचायत समिती