शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बुडीतक्षेत्राचा बागुलबुवा, प्रशासनाची पळवाट

By admin | Updated: August 10, 2016 00:02 IST

सावरखेड येथील बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीमध्ये गावातील पाणी सोडण्यासाठी पाईप टाकणे,..

सावरखेड पूलवजा बंधारा : पुलांना कठडे, संरक्षण भिंतीमध्ये पाणी जाण्यासाठी पाईप गरजेचेअमरावती : सावरखेड येथील बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीमध्ये गावातील पाणी सोडण्यासाठी पाईप टाकणे, या बंधाऱ्याच्या स्लॅबची डागडुजी व पुलास कठडे यासह अन्य कामासाठी प्रशासकीय यंत्रणाद्वारा बुडीत क्षेत्राचा बागुलबुवा करण्यात येत असल्याने हा अडीच हजार नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. पेढी प्रकल्पाला १२ आॅगस्ट २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात अळणगाव, कुंडखुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण, हातुर्णा ही पाच गावे येतात. या बाधित गावांचे पुनर्वसन सन २०१७-१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याच प्रकल्पाच्या अंशत: बुडीत क्षेत्रात ओझरखेड व सावरखेड ही गावे येतात. यामध्ये सावरखेडच्या ४०० घरांपैकी केवळ ४० ते ५० घरेच फक्त बुडीत क्षेत्रात आहेत. ९० टक्के गावाचा बुडीत क्षेत्राशी संबंध नसतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभाग व लघुसिंचन पाटबंधारे विभागाद्वारा बुडीत क्षेत्राचा भाग म्हणून विकास कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाचे २६ मे २००५ चे निर्णयानुसार बुडीत क्षेत्रात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास शासनाचे कुठलेही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले असतानासुद्धा पेढी नदीवरचा पूलवजा बंधाऱ्याची दुरुस्तीव व अन्य कामे करण्यास प्रशासकीय यंत्रणेद्वारे टाळाटाळ केली जात आहे. एवढेच नव्हे, तर महात्मा फुले अभियानांतर्गत या पुलाची बुडीत क्षेत्र असल्याने कामे करता येत नाही. अशा शेऱ्यानिशी अंदाजपत्रक परत पाठविल्याचा प्रकार घडला. ‘लोकमत’ने हा प्रश्न लोकदरबारात मांडल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गांभीर्याने घेतले व तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनीदेखील बुडीत क्षेत्राचा बागुलबुवा न करता अन्य कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)