शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

वाठोडा गावात तीन तासांत श्रमदानातून उभारला बंधारा

By admin | Updated: May 7, 2016 00:42 IST

वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाने पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजिलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत यशस्वी होऊन ५० लाख रुपयांचे पहिले बक्षीस

सहभाग : ड्रायझोन कमी होण्याचा विश्वास वरूड : वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाने पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजिलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत यशस्वी होऊन ५० लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकविण्याचा ग्रामस्थांनी चंग बांधला आहे. सोमवारी तीन तासांत वाठोड्यातील सर्वच महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा ३०० ग्रामस्थांनी सुमारे ५० फूट लांबीचा बंधारा उभारून तालुक्यात आदर्श घडविला. पुढील काळात सध्या ड्रायझोन म्हणून जाहीर झालेला वरूड तालुका दुष्काळमुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे श्रेय विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व महसूल, कृषी यंत्रणा व ग्रामस्थांना जाते.गावातील सुमारे ३०० महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शालेय मुला-मुलींचाही प्रचंड उत्साह होता. उपस्थित ग्रामस्थांनी ५०-५० च्या सहा रांगा लावून साखळी पद्धतीने काढलेला गाळ एकत्र करून बंधारा तयार केला. १-२ ट्रॅक्टर भरून दगड बंधाऱ्यावर टाकुन पिचिंग करण्यात आली. आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी गित्ते, तहसीलदार भुसारी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगरदे यांच्यासह गावातील सर्वच नागरिक सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी वाठोडा या गावी आतापर्यंत १५० सलग समतल चर तसेच तलावातील गाळ काढणे, बंधारा बांधणे, ६-७ पांदण रस्ते अशी कामे झाली आहेत. ज्यांना श्रमदान करता येत नाही, अशा संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्येकी १००-२०० रुपये देऊन पाच हजार रुपये निधी जमा केला, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)