शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंबाबत शासनाचा दुजाभाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 3, 2024 17:40 IST

तीन महिन्यांतील दोन अध्यादेशात तफावत : एनआयएस प्रशिक्षकांना डावलले

अमरावती : ऑलिम्पिक आले की क्रीडापंटूबाबत उदार होणाऱ्या शासनाने तीन महिन्यांत काढलेल्या दोन अध्यादेशात तफावत आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी शासनाचा दुजाभाव असल्याचा आरोप क्रीडापटूंद्वारा होत आहे. शिवाय यामध्ये एनआयएस पदविकाधारकांवर अन्याय केल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे.

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने २९ मे २०२४ रोजी अध्यादेश जारी केला होता. यामध्ये शासनाने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना शासकीय सेवेत नोकरी देण्याचे नमूद केले आहे. ५ टक्के खेळाडू आरक्षण देताना पदाचा विचार करून या बाबी अध्यादेशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

त्यानंतर ५ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशात महाराष्ट्र राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. यामध्ये केवळ ऑलिम्पिक, आशियाई, वर्ल्ड, पॅरा ऑलिम्पिक जागतिक खेळाचा व अर्जुन पुरस्कारार्थीचा समावेश केला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडूंवर एकप्रकारे अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. अत्युच्य गुणवत्ताधारक खेळाडूंना अध्यादेशात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रीय, अ. भा. विद्यापीठ, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक, प्रशिक्षक खेळाडू, एनआयएस डिप्लोमाधारक प्रशिक्षक यांच्यात नाराजीचा सूर आहे.

अन्य राज्यात खेळाडूंना संधी, महाराष्ट्रात डावलले

छत्तीसगड, बिहार, राजस्थानसह अन्य राज्यात वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडू व त्या राज्याचा क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासनसेवेत थेट सामावून घेण्याचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्रात मात्र डावलण्यात आल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे. शिवाय नॅशनल इन्स्टिट्यूड ऑफ स्पोर्टस याभारतातील मान्यताप्राप्त खेळाडू प्रशिक्षक डिप्लोमाधारकांनाही या अध्यादेशात डावलले आहे.

"राज्याचा क्रीडा पुरस्कार विजेते, वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळलेले व एनआयएस डिप्लोमाधारक खेळाडूंना अध्यादेशात स्थान नाही. या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (क्रीडा) यांची भेट घेतली तर ते सकारात्मक नसल्याने राज्याच्या क्रीडा धोरणाला बाधक आहे."- डॉ. अभिजित इंगोले, एनआयएस प्रशिक्षक (सॉफ्टबॉल), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त

टॅग्स :Amravatiअमरावती