शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंबाबत शासनाचा दुजाभाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 3, 2024 17:40 IST

तीन महिन्यांतील दोन अध्यादेशात तफावत : एनआयएस प्रशिक्षकांना डावलले

अमरावती : ऑलिम्पिक आले की क्रीडापंटूबाबत उदार होणाऱ्या शासनाने तीन महिन्यांत काढलेल्या दोन अध्यादेशात तफावत आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी शासनाचा दुजाभाव असल्याचा आरोप क्रीडापटूंद्वारा होत आहे. शिवाय यामध्ये एनआयएस पदविकाधारकांवर अन्याय केल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे.

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने २९ मे २०२४ रोजी अध्यादेश जारी केला होता. यामध्ये शासनाने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना शासकीय सेवेत नोकरी देण्याचे नमूद केले आहे. ५ टक्के खेळाडू आरक्षण देताना पदाचा विचार करून या बाबी अध्यादेशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

त्यानंतर ५ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशात महाराष्ट्र राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. यामध्ये केवळ ऑलिम्पिक, आशियाई, वर्ल्ड, पॅरा ऑलिम्पिक जागतिक खेळाचा व अर्जुन पुरस्कारार्थीचा समावेश केला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडूंवर एकप्रकारे अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. अत्युच्य गुणवत्ताधारक खेळाडूंना अध्यादेशात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रीय, अ. भा. विद्यापीठ, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक, प्रशिक्षक खेळाडू, एनआयएस डिप्लोमाधारक प्रशिक्षक यांच्यात नाराजीचा सूर आहे.

अन्य राज्यात खेळाडूंना संधी, महाराष्ट्रात डावलले

छत्तीसगड, बिहार, राजस्थानसह अन्य राज्यात वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडू व त्या राज्याचा क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासनसेवेत थेट सामावून घेण्याचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्रात मात्र डावलण्यात आल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे. शिवाय नॅशनल इन्स्टिट्यूड ऑफ स्पोर्टस याभारतातील मान्यताप्राप्त खेळाडू प्रशिक्षक डिप्लोमाधारकांनाही या अध्यादेशात डावलले आहे.

"राज्याचा क्रीडा पुरस्कार विजेते, वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळलेले व एनआयएस डिप्लोमाधारक खेळाडूंना अध्यादेशात स्थान नाही. या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (क्रीडा) यांची भेट घेतली तर ते सकारात्मक नसल्याने राज्याच्या क्रीडा धोरणाला बाधक आहे."- डॉ. अभिजित इंगोले, एनआयएस प्रशिक्षक (सॉफ्टबॉल), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त

टॅग्स :Amravatiअमरावती