शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष वगळता बॅकलॉग परीक्षा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्रांच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. ...

अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्रांच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. १५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठ अंतर्गत बॅकलॉगचे सुमारे ९० हजार विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून नोंदविले गेले आहेत. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा, प्रश्नपत्रिका, मू्ल्यांकन आदी बाबी महाविद्यालयांना कराव्या लागतील. २२ ते ३० डिसेंबर या कालावधीत परीक्षांचे नियोजन करून गुण विद्यापीठात पाठवावे लागणार आहेत. ही परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार असून, एकूण चार प्रश्न विचारले जातील. चार प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला १० गुण राहतील. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियाेजन करावे, अशा सूचना विद्यापीठाने पत्रातून प्राचार्यांना केल्या आहेत. परीक्षेशी निगडीत आवश्यक साहित्य महाविद्यालयांत पोहचविण्यात आले आहे.

------------

बॉक्स

एम.फिल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे

एम.फिल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना तयार कराव्या लागतील. ४० प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा अवधी मिळेल. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा वेळ अतिरिक्त दिला जाणार आहे. परीक्षा संपताच १५ दिवसांत पेपर गोपनीय विभागात जमा करावे लागणार आहेत.

-----------

कोरोना नियामवलींचे पालन करून महाविद्यालयांना परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठविले असून, ३० डिसेंबरपर्यंत परीक्षा आटोपून गुण पाठवावे लागतील, असे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.