शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

आश्वासनात आघाडी अंमलबजावणीत पिछाडी

By admin | Updated: February 11, 2015 00:20 IST

जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र अंमलबजावणीच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करीत आहे अशी स्थिती आहे.पीक नुकसानापोटी आतापर्यंत १२५ कोटीचे वितरण करुन आणखी कोट्यवधीच्या वाटपाला मंजुरी देऊन शासनाने तरतूद केली आहे. मागील १०० दिवसात मदत आणि पुनर्वसन विभागाला निर्णय घेण्यातील आघाडी अंमलबजावणी बाबत मात्र पाळता आलेली नाही. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही सुरूच आहेत. हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे. विदर्भात अमरावती विभाग, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासह फळबागाही बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. येत्या काळात नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा डेडलाईन देऊनही शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १९८१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी दिसून आली होती.