शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

आश्वासनात आघाडी अंमलबजावणीत पिछाडी

By admin | Updated: February 11, 2015 00:20 IST

जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र अंमलबजावणीच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करीत आहे अशी स्थिती आहे.पीक नुकसानापोटी आतापर्यंत १२५ कोटीचे वितरण करुन आणखी कोट्यवधीच्या वाटपाला मंजुरी देऊन शासनाने तरतूद केली आहे. मागील १०० दिवसात मदत आणि पुनर्वसन विभागाला निर्णय घेण्यातील आघाडी अंमलबजावणी बाबत मात्र पाळता आलेली नाही. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही सुरूच आहेत. हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे. विदर्भात अमरावती विभाग, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासह फळबागाही बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. येत्या काळात नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा डेडलाईन देऊनही शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १९८१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी दिसून आली होती.