शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

आश्वासनात आघाडी अंमलबजावणीत पिछाडी

By admin | Updated: February 11, 2015 00:20 IST

जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र अंमलबजावणीच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करीत आहे अशी स्थिती आहे.पीक नुकसानापोटी आतापर्यंत १२५ कोटीचे वितरण करुन आणखी कोट्यवधीच्या वाटपाला मंजुरी देऊन शासनाने तरतूद केली आहे. मागील १०० दिवसात मदत आणि पुनर्वसन विभागाला निर्णय घेण्यातील आघाडी अंमलबजावणी बाबत मात्र पाळता आलेली नाही. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही सुरूच आहेत. हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे. विदर्भात अमरावती विभाग, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासह फळबागाही बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. येत्या काळात नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा डेडलाईन देऊनही शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १९८१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी दिसून आली होती.