शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 11:48 IST

अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नियोजन चुकल्यामुळेच पराभव झाला. आता अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही, ही बाब राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेने चारही उमेदवारांच्या मतदानाचा कोटा निश्चित केला नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली चूल सुरक्षित राहावी, एवढेच नियोजन केले. पहिल्या, दुसऱ्या मतांचा कोटा न ठरविल्याने नियोजन चुकले आणि शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे कडू म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याच्या आराेपाबाबत कडू म्हणाले, अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचा नेमका निशाणा कुठे?

शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कौतुक केल्याविषयी कडू म्हणाले की, हा विषय कौतुक करण्यासारखा नाही. स्वत:चे नियोजन चुकीचे करायचे आणि दुसऱ्याला विजय मिळाला की कौतुक करायचे, हे योग्य नाही. शरद पवार हे कौतुक करताना त्यांचा नेमका निशाणा कुठे असते, हे सांगता येत नाही. होऊ शकते भविष्यात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचे असेल, अशी ना. कडू यांनी शेलकी लगावली.

निवडणूक म्हटले की घोडेबाजार आलाच

निवडणूक कोणतीही असू द्या, यात घोडेबाजार आलाच. राज्याला घोडेबाजार हा शब्द वेगळा वाटत असला तरी प्रत्येक निवडणुकीत ते होते. आम्ही निवडणुकीत मतांचा जोगवा मागावयास जातो, तेव्हा काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने कामांची मागणी, अट घालतात. त्यामुळे अशा निवडणुकीत गरीब, सामान्य नेतृत्व उमेदवार म्हणून राहू शकत नाही. त्यासाठी मतदान प्रक्रियेवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज झाली, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडी