शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 11:48 IST

अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नियोजन चुकल्यामुळेच पराभव झाला. आता अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही, ही बाब राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेने चारही उमेदवारांच्या मतदानाचा कोटा निश्चित केला नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली चूल सुरक्षित राहावी, एवढेच नियोजन केले. पहिल्या, दुसऱ्या मतांचा कोटा न ठरविल्याने नियोजन चुकले आणि शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे कडू म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याच्या आराेपाबाबत कडू म्हणाले, अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचा नेमका निशाणा कुठे?

शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कौतुक केल्याविषयी कडू म्हणाले की, हा विषय कौतुक करण्यासारखा नाही. स्वत:चे नियोजन चुकीचे करायचे आणि दुसऱ्याला विजय मिळाला की कौतुक करायचे, हे योग्य नाही. शरद पवार हे कौतुक करताना त्यांचा नेमका निशाणा कुठे असते, हे सांगता येत नाही. होऊ शकते भविष्यात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचे असेल, अशी ना. कडू यांनी शेलकी लगावली.

निवडणूक म्हटले की घोडेबाजार आलाच

निवडणूक कोणतीही असू द्या, यात घोडेबाजार आलाच. राज्याला घोडेबाजार हा शब्द वेगळा वाटत असला तरी प्रत्येक निवडणुकीत ते होते. आम्ही निवडणुकीत मतांचा जोगवा मागावयास जातो, तेव्हा काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने कामांची मागणी, अट घालतात. त्यामुळे अशा निवडणुकीत गरीब, सामान्य नेतृत्व उमेदवार म्हणून राहू शकत नाही. त्यासाठी मतदान प्रक्रियेवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज झाली, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडी