शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 11:48 IST

अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नियोजन चुकल्यामुळेच पराभव झाला. आता अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही, ही बाब राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेने चारही उमेदवारांच्या मतदानाचा कोटा निश्चित केला नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली चूल सुरक्षित राहावी, एवढेच नियोजन केले. पहिल्या, दुसऱ्या मतांचा कोटा न ठरविल्याने नियोजन चुकले आणि शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे कडू म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याच्या आराेपाबाबत कडू म्हणाले, अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचा नेमका निशाणा कुठे?

शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कौतुक केल्याविषयी कडू म्हणाले की, हा विषय कौतुक करण्यासारखा नाही. स्वत:चे नियोजन चुकीचे करायचे आणि दुसऱ्याला विजय मिळाला की कौतुक करायचे, हे योग्य नाही. शरद पवार हे कौतुक करताना त्यांचा नेमका निशाणा कुठे असते, हे सांगता येत नाही. होऊ शकते भविष्यात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचे असेल, अशी ना. कडू यांनी शेलकी लगावली.

निवडणूक म्हटले की घोडेबाजार आलाच

निवडणूक कोणतीही असू द्या, यात घोडेबाजार आलाच. राज्याला घोडेबाजार हा शब्द वेगळा वाटत असला तरी प्रत्येक निवडणुकीत ते होते. आम्ही निवडणुकीत मतांचा जोगवा मागावयास जातो, तेव्हा काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने कामांची मागणी, अट घालतात. त्यामुळे अशा निवडणुकीत गरीब, सामान्य नेतृत्व उमेदवार म्हणून राहू शकत नाही. त्यासाठी मतदान प्रक्रियेवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज झाली, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडी