शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 11:48 IST

अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नियोजन चुकल्यामुळेच पराभव झाला. आता अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही, ही बाब राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेने चारही उमेदवारांच्या मतदानाचा कोटा निश्चित केला नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली चूल सुरक्षित राहावी, एवढेच नियोजन केले. पहिल्या, दुसऱ्या मतांचा कोटा न ठरविल्याने नियोजन चुकले आणि शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे कडू म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याच्या आराेपाबाबत कडू म्हणाले, अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचा नेमका निशाणा कुठे?

शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कौतुक केल्याविषयी कडू म्हणाले की, हा विषय कौतुक करण्यासारखा नाही. स्वत:चे नियोजन चुकीचे करायचे आणि दुसऱ्याला विजय मिळाला की कौतुक करायचे, हे योग्य नाही. शरद पवार हे कौतुक करताना त्यांचा नेमका निशाणा कुठे असते, हे सांगता येत नाही. होऊ शकते भविष्यात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचे असेल, अशी ना. कडू यांनी शेलकी लगावली.

निवडणूक म्हटले की घोडेबाजार आलाच

निवडणूक कोणतीही असू द्या, यात घोडेबाजार आलाच. राज्याला घोडेबाजार हा शब्द वेगळा वाटत असला तरी प्रत्येक निवडणुकीत ते होते. आम्ही निवडणुकीत मतांचा जोगवा मागावयास जातो, तेव्हा काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने कामांची मागणी, अट घालतात. त्यामुळे अशा निवडणुकीत गरीब, सामान्य नेतृत्व उमेदवार म्हणून राहू शकत नाही. त्यासाठी मतदान प्रक्रियेवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज झाली, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडी