शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

झाडांच्या कत्तलीसाठी ‘बी अ‍ॅन्ड सी’ जबाबदार

By admin | Updated: April 20, 2017 00:10 IST

राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा ...

प्रकाश साबळे यांची तक्रार : हिरवेगार वृक्ष वाचविण्याचे आर्जवअमरावती : राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. हिरवेगार वृक्ष वाचविण्यासाठीची आर्जव कार्यकारी अभियंत्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.वलगाव- चांदूरबाजार राज्यमार्गावर झाडाच्या बुंध्याशी आग लावून अवैध वृक्षतोड केल्या जात असल्याचे सचित्र वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत झाले. या वृत्ताचीे दखल घेत जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांना तक्रार देऊन बिट्रीशकालीन झाडे वाचविण्याची मागणी करण्यात आली. शहरालगत वलगाव-चांदूरबाजार, अमरावती- परतवाडा, अमरावती- दर्यापूर या राज्य मार्गावरील हिरवेगार वृक्षांना बुंध्यांशी आगी लाऊन ते नष्ट केले जात आहे. खरे तर राज्य मार्गावरील झाडांचे जतन करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे; तथापि शेकडो वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन लाकूड तस्करी केली जात आहे. मात्र बांधकाम विभागाने एकाही अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली नाही, असा आरोप साबळे यांनी केला आहे. सातत्याने राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्ष नष्ट होण्यामागे बांधकाम विभागाच जबाबदार आहे. राज्य मार्गावरील किती हिरव्यागार झाडांना आग लाऊन ते नष्ट करण्यात आले, याची माहिती देखील बांधकाम विभागाकडे नसल्याचे प्रकाश साबळे यांचे म्हणणे आहे. राज्य मार्गालगतच्या हिरवेगार झाडांची कत्तल करुन होणाऱ्या लाकूड तस्करीत बांधकाम विभागाचे अधिकारी तर सहभागी नाहीत, असा सवाल प्रकाश साबळे यांनी उपस्थित केला आहे. झाडांच्या बुंध्यांशी आग लाऊन ते नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.