शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

झाडांच्या कत्तलीसाठी ‘बी अ‍ॅन्ड सी’ जबाबदार

By admin | Updated: April 20, 2017 00:10 IST

राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा ...

प्रकाश साबळे यांची तक्रार : हिरवेगार वृक्ष वाचविण्याचे आर्जवअमरावती : राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. हिरवेगार वृक्ष वाचविण्यासाठीची आर्जव कार्यकारी अभियंत्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.वलगाव- चांदूरबाजार राज्यमार्गावर झाडाच्या बुंध्याशी आग लावून अवैध वृक्षतोड केल्या जात असल्याचे सचित्र वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत झाले. या वृत्ताचीे दखल घेत जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांना तक्रार देऊन बिट्रीशकालीन झाडे वाचविण्याची मागणी करण्यात आली. शहरालगत वलगाव-चांदूरबाजार, अमरावती- परतवाडा, अमरावती- दर्यापूर या राज्य मार्गावरील हिरवेगार वृक्षांना बुंध्यांशी आगी लाऊन ते नष्ट केले जात आहे. खरे तर राज्य मार्गावरील झाडांचे जतन करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे; तथापि शेकडो वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन लाकूड तस्करी केली जात आहे. मात्र बांधकाम विभागाने एकाही अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली नाही, असा आरोप साबळे यांनी केला आहे. सातत्याने राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्ष नष्ट होण्यामागे बांधकाम विभागाच जबाबदार आहे. राज्य मार्गावरील किती हिरव्यागार झाडांना आग लाऊन ते नष्ट करण्यात आले, याची माहिती देखील बांधकाम विभागाकडे नसल्याचे प्रकाश साबळे यांचे म्हणणे आहे. राज्य मार्गालगतच्या हिरवेगार झाडांची कत्तल करुन होणाऱ्या लाकूड तस्करीत बांधकाम विभागाचे अधिकारी तर सहभागी नाहीत, असा सवाल प्रकाश साबळे यांनी उपस्थित केला आहे. झाडांच्या बुंध्यांशी आग लाऊन ते नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.