शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

झाडांच्या कत्तलीसाठी ‘बी अ‍ॅन्ड सी’ जबाबदार

By admin | Updated: April 20, 2017 00:10 IST

राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा ...

प्रकाश साबळे यांची तक्रार : हिरवेगार वृक्ष वाचविण्याचे आर्जवअमरावती : राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. हिरवेगार वृक्ष वाचविण्यासाठीची आर्जव कार्यकारी अभियंत्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.वलगाव- चांदूरबाजार राज्यमार्गावर झाडाच्या बुंध्याशी आग लावून अवैध वृक्षतोड केल्या जात असल्याचे सचित्र वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत झाले. या वृत्ताचीे दखल घेत जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांना तक्रार देऊन बिट्रीशकालीन झाडे वाचविण्याची मागणी करण्यात आली. शहरालगत वलगाव-चांदूरबाजार, अमरावती- परतवाडा, अमरावती- दर्यापूर या राज्य मार्गावरील हिरवेगार वृक्षांना बुंध्यांशी आगी लाऊन ते नष्ट केले जात आहे. खरे तर राज्य मार्गावरील झाडांचे जतन करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे; तथापि शेकडो वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन लाकूड तस्करी केली जात आहे. मात्र बांधकाम विभागाने एकाही अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली नाही, असा आरोप साबळे यांनी केला आहे. सातत्याने राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्ष नष्ट होण्यामागे बांधकाम विभागाच जबाबदार आहे. राज्य मार्गावरील किती हिरव्यागार झाडांना आग लाऊन ते नष्ट करण्यात आले, याची माहिती देखील बांधकाम विभागाकडे नसल्याचे प्रकाश साबळे यांचे म्हणणे आहे. राज्य मार्गालगतच्या हिरवेगार झाडांची कत्तल करुन होणाऱ्या लाकूड तस्करीत बांधकाम विभागाचे अधिकारी तर सहभागी नाहीत, असा सवाल प्रकाश साबळे यांनी उपस्थित केला आहे. झाडांच्या बुंध्यांशी आग लाऊन ते नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.