शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात स्वयंचलित हवामान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:09 IST

अमरावती : हवामान बदलामुळे पिकांवर वेळोवेळी संकटे येतात. ही संकटे येण्यापूर्वी परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे संभाव्य ...

अमरावती : हवामान बदलामुळे पिकांवर वेळोवेळी संकटे येतात. ही संकटे येण्यापूर्वी परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळू शकतील, याकरिता श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली.

केंद्राचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी झाले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे, प्राचार्य शशांक देशमुख, हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख शेखर बंड यांची उपस्थिती होती.

स्कायमेट कंपनीद्वारे स्थापित या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाच्या अचूक अंदाजासोबत वायूचा वेग, वायूची दिशा, जमिनीतील तापमान, जमिनीतील आर्द्रता, जमिनीतील ओलावा, सूर्याचे विकिरण अशा अनेक बाबींची माहिती विविध प्रकारच्या सेन्सरद्वारे मिळणार आहे. भविष्यात ॲपची निर्मिती करण्यात येणार असून या ॲपद्वारे प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाइलमध्ये हवामानाची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहे. हवामान केंद्र स्थापित करण्याकरिता अतुल वानखडे, विशाल अढाऊ, विलास पडोळे यांनी विशेष प्रयत्न केले.

बॉक्स

स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना भविष्यात होणाऱ्या हवामान बदलाची माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकेल, तसेच शेतीचे नियोजनसुद्धा करता येईल.

- हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती