शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उमेदवारीत ‘नापास’ प्रचारात ‘प्रामाणिक’

By admin | Updated: October 13, 2014 23:16 IST

'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे.

अमरावती : 'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे. मात्र, यापुढील विधानसभा आणि लोकसभा या वरच्या आणि महत्त्वाच्या स्तरावर झेप घेऊ पाहणाऱ्या महिलांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकून ठेवले आहे. आपल्या समाजातील पुरूषी मनोवृत्ती अद्यापही संपली नसल्याचेच हे द्योतक आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष प्रचारात मात्र खात्रीचे प्रचारक म्हणून वावरताना दिसत आहे. राजकारणाचा पाया असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना समर्थपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेपर्यंत अडकविले गेले आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देऊन त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना सुरूंग लावत कायदे बनविले जाणाऱ्या या दोन्ही सभागृहांपासून महिलांना दूर ठेवण्याचा कुटील डाव पुरूषी महत्त्वाकांक्षेकडून खेळला जात आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत नशीब आजमाविणाऱ्या एकूण १३५ उमेदवारांमध्ये १४ महिलांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यापैकी केवळ सात महिलांनाच राजकीय पक्षांची उमेदवारी लाभली आहे. यावरून राजकीय पक्षांमधील महिलांविषयीची कमालीची उदासीनता दिसून येत असल्याचे सिद्ध होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्यक्ष उमेदवार म्हणून महिलांना उतरविण्यात राजकीय पक्षांचा हवा तेवढा कल नसल्याचे दिसून येते. महिला मतदारांवर डोळा ठेवून प्रचारात मात्र त्यांना आवर्जून गोवले जात आहे. त्यामागेही आकड्यांचे गणित आहे. जिल्ह्यात एकूण साधारणपणे २२ लाख २१ हजार ६२४ मतदार आहेत. यामध्ये महिला १० लाखांच्या वर तर पुरुषांची आकडेवारी ११ लाखांच्या वर आहे. हे लक्षात घेऊन राजकीय व्यूहरचना ठरविण्यात येते. महिलांची उमेदवारी जरी कमी असली तरी महिला मतदारसंख्या पाहता त्यांना प्रचारात सन्मान मिळाले. (प्रतिनिधी)