शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उमेदवारीत ‘नापास’ प्रचारात ‘प्रामाणिक’

By admin | Updated: October 13, 2014 23:16 IST

'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे.

अमरावती : 'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे. मात्र, यापुढील विधानसभा आणि लोकसभा या वरच्या आणि महत्त्वाच्या स्तरावर झेप घेऊ पाहणाऱ्या महिलांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकून ठेवले आहे. आपल्या समाजातील पुरूषी मनोवृत्ती अद्यापही संपली नसल्याचेच हे द्योतक आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष प्रचारात मात्र खात्रीचे प्रचारक म्हणून वावरताना दिसत आहे. राजकारणाचा पाया असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना समर्थपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेपर्यंत अडकविले गेले आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देऊन त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना सुरूंग लावत कायदे बनविले जाणाऱ्या या दोन्ही सभागृहांपासून महिलांना दूर ठेवण्याचा कुटील डाव पुरूषी महत्त्वाकांक्षेकडून खेळला जात आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत नशीब आजमाविणाऱ्या एकूण १३५ उमेदवारांमध्ये १४ महिलांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यापैकी केवळ सात महिलांनाच राजकीय पक्षांची उमेदवारी लाभली आहे. यावरून राजकीय पक्षांमधील महिलांविषयीची कमालीची उदासीनता दिसून येत असल्याचे सिद्ध होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्यक्ष उमेदवार म्हणून महिलांना उतरविण्यात राजकीय पक्षांचा हवा तेवढा कल नसल्याचे दिसून येते. महिला मतदारांवर डोळा ठेवून प्रचारात मात्र त्यांना आवर्जून गोवले जात आहे. त्यामागेही आकड्यांचे गणित आहे. जिल्ह्यात एकूण साधारणपणे २२ लाख २१ हजार ६२४ मतदार आहेत. यामध्ये महिला १० लाखांच्या वर तर पुरुषांची आकडेवारी ११ लाखांच्या वर आहे. हे लक्षात घेऊन राजकीय व्यूहरचना ठरविण्यात येते. महिलांची उमेदवारी जरी कमी असली तरी महिला मतदारसंख्या पाहता त्यांना प्रचारात सन्मान मिळाले. (प्रतिनिधी)