शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सौरदिव्यावरून सभागृह तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:11 IST

जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते. या विषयावर आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी सभेत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीत वित्त आयोग, पेसा, समाजकल्याण, पर्यावरण संतुलित अशा विविध योजनांतून गावागावांत सौरदिवे लावण्यात आले. यापोटी लाखोंचा खर्च झाला. दोन वर्षात किती ठिकाणी सौरदिवे लावले, त्यांची सद्यस्थिती काय, असा प्रश्न सभापती बळवंत वानखडे यांनी प्रशासनाला विचारला. यासंदर्भात प्रशासनाने स्थायी समितीत माहिती मागितली. ती माहिती योग्यरीत्या जुळत नसल्याची बाब वानखडे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केल्या प्रकरणी काही गटविकास अधिकारी व झेडपीच्या संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. हा विषय तापल्याने अखेर पिठासिन सभापती यांनी मध्यस्थी करत पुढील सभेत योग्य माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हा विषय निवळला. यावेळी शिक्षण विभागाने रामगांव येथे केंद्रीय शाळेतील चुकीच्या कारवाईचा मुद्दा सुनील डिके यांनी मांडत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी इतरही विभागाचे मुद्दे गाजले. सभेला झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, सुनील डीके, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर, अ‍ॅडिशनल सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, कैलास घोडके, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, प्रमोद तलवारे, संजय येवले, कॅफो रवींद्र येवले उपस्थित होते.सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपलीविरोधकांची विकासकामे त्वरित होतात. मग सत्ताधाऱ्यांची का नाही. यावरून स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांत चांगली जुंपली. विरोधकांना निधी द्यायचा नाही, नियमानुसार कामे मार्गी लावली तर त्यातही आडकाठी आणत राजकारण होत असल्याचा रवींद्र मुंदे यांनी केला. २५-१५ या लेखाशिर्षाखाली १ कोटी ९० लाखांचा निधी मुंदे यांनी आणला. या कामांचे सोपस्कारही पूर्ण केले. मग एकाच सदस्यांची कामे कशी होतात, असा प्रश्न सदस्य प्रियंका दगडकर यांनी उपस्थित केला. परंतु पदाधिकाऱ्यांच्या मंजूर कामांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने अध्यक्षांनी यावर आक्षेप घेतल्याने हा वाद उदभवला.