शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

जिल्ह्यातील ६० रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया

By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे....

१२ कोटींचे उत्पन्न : महसुलात होणार वाढअमरावती : जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. याशिवाय उर्वरित रेतीघाटांचेही लिलाव होताच या महसुलाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत रेतीघाटात पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे.जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून वाहत असलेल्या ११ नद्यांवरील ८१ घाटांमधून वाळू उपसा केला जातो. जिल्ह्यात सर्वाधिक ११ रेतीघाट भातकुली तालुक्यात असून तेथील घाटांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. त्यामुळे या भागातून अवैध वाळूतस्करी होत आहे. काही दिवसांपूर्वीच भातकुलीचे तहसीलदार मनोज येळे यांच्यावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय इतरही ठिकाणी शहरात अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी राबविलेल्या वाळू साठ्यावरील धाडसत्रात रेतीमाफिया कडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या धाड सत्रामुळे वाळू साठ्यावर निर्बंध आणले होते. याचा परिणाम म्हणून वाळू घाटांच्या लिलावर झालेला दिसून येत आहे. मागी, वर्षीच्या तुलनेत ७ कोटी रूपयांचे अधिक उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरी व ग्रामीण भागात सिमेंट क्रॉक्रिटच्या पक्क्या घरांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. याशिवाय निवडणुकांपूर्वी घोषित करण्यात आलेली विकासकामेदेखील बऱ्याच प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)