शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

गोवंशहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष

By admin | Updated: July 26, 2016 00:23 IST

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारताच अनेक धाडसी निर्णय घेतले.

विश्वहिंदू परिषद : जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलनअमरावती : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारताच अनेक धाडसी निर्णय घेतले. यापैकीच एक असलेल्या गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागू केला आहे. मात्र या कायद्याची जिल्ह्यात प्रशासनाचे दुर्लक्षामुळे याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाकचेरी समोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने लक्षवेधी धरणे आंदोलन केले. प्रमुख मागण्यांमध्ये गोवंशहत्या बंदी कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चांदूरबाजार तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. त्याला जबाबदार प्रशासक ीय सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व गो-तस्करांना सहाकार्य करणारे सर्व कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी, चांदूर बाजार मार्गावरील खरवाडीजवळ गो-तस्करांव्दारा गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने जाणीव पूर्वक केलेल्या अपघातात किशोर इंगळे यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या कृत्याला जाबाबदार असणारे वाहनचालक क्लिनर व सहायकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ५०० हून अधिक आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, गोवंशहत्या बंदी कायद्याची पायमल्ली होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणारी ९ सदस्यीय समिती प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात यावी, यामध्ये दोन प्रशासकीय अधिकारी, विहिंप, बजरंग दलाचा प्रत्येकी एक पदाधिकारी, वकील, एक पशुचिकित्सक तसेच ज्येष्ठ समाजसेवक असावा व नियमित बैठकी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी, किशोर इंगळे कुटुंबातील अनाथ झालेल्या सुजल इंगळे याला १५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, तसेच त्याच्या पुढील आयुष्याची हमी राज्य शासनाने घ्यावी, अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करण्यात यावा.आदी मागण्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने शासन व प्रशानाचे लक्ष वेधले.याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळीे विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिकटे, महानगरध्यक्ष अरूण मोंढे, जिल्हामहामंत्री शरद अग्रवाल, संतोष गहरवाल, प्रवीण गिरी, निरंजन दुबे, अनिल साहू, राजेश घोडके व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याचा सहभाग होता. (प्रतिनिधी)शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा राज्यात लागू केला आहे. मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसून अवैधरित्या होणाऱ्या गोवंशहत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला वेळीच नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे. - अरूण मोंढे,महानगरप्रमुख, विश्व हिंदू परिषद