शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

दारूबंदीसाठी हल्लाबोल

By admin | Updated: July 12, 2017 00:16 IST

तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली.

पाच दिवसांत ४९५ पिंप उद्ध्वस्त : ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त, महिलांचा पुढाकारमनोज मानतकर। लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली. या कारवाईत ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दारूबंदीसाठी स्त्रियांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यसाठी महिला ठाणेदारांनी घेतलेला पुढाकार यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील बिअरबार, वाईन शॉप बंद झाल्याने गावठी दारू विक्रेत्यांना उधाण आले असून खेडोपाडी जणू काही दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने गावठी दारूला लगाम लावण्यासाठी नांदगावच्या महिला ठाणेदार रीता उईके यांच्या मार्गदर्शनात महिलांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका घेत जनजागृती सुरू केली होती. तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये गावठी दारूमुळे शांतता भंग पावत असून वातावरण दूषित झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने याला आळा घालण्यासाठी नांदगावच्या ठाणेदार रीता उईके यांनी शिवणी गावात महिलांची बैठक घेतली व दारूबंदीसाठी महिलांना एकजूट करून आठवडाभरात शेकडो पिंप गावठी दारू उद्ध्वस्त केली. हजारो रुपयांचा मुद्देमालही नांदगावातील ओंकारखेडा परिसरातील पारधी बेड्यावरून जप्त केला. शिवणीतील महिलांनी ठाणेदारांसमवेत परिसरातील नदीलगतच्या तसेच गावानजीकच्या गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्यामुळे दारूविक्रेते धास्तावले असून गावठी दारू काढण्यासाठी दारूविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. दारूबंदी विरोधातील महिला रात्रंदिवस गाठवी दारू काढण्याच्या स्थळांचा शोध घेत असल्याने दारूविक्रेत्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत आहे. दारूबंदीसाठी शिवणीतील महिलांनी एल्गार पुकारला असून सीता मरगडे, उज्ज्वला देशमुख, मीरा शेंडे, छबू कापडे, मंगला बुरे, महानंदा बुरे, कुसूम मारबदे, कुसूम मेश्राम, सुनंदा पंचबुद्धे, बेबी केवट, शोभा तऱ्हेकर, पुष्पा मेश्राम, इंदिरा शेंडे, पंचफुला शिंदे यांच्यासह शेकडो महिला दारूबंदी होण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. शिवणीत होणार दारूबंदीचा ठरावशासनाने शेतकरीहितार्थ निर्णय घ्यावा, यासाठी ज्या शिवणी गावातून आंदोलनाची ठिणगी पेटली, त्याच गावातून आता दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत व लवकरच दारूबंदीचा ठरावसुद्धा ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच मधुकर कोठाळे यांनी सांगितले. महिलांची साथ लाभल्यास अवैधरीत्या सुरू असलेली गावठी दारू पूर्णपणे बंद होणे शक्य होईल. कारण पोलीस प्रशासन तर आपले कार्य करीतच आहे. परंतु, आपले संसार उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी महिलांनीसुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे. - रीता उईके, ठाणेदार