शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दारूबंदीसाठी हल्लाबोल

By admin | Updated: July 12, 2017 00:16 IST

तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली.

पाच दिवसांत ४९५ पिंप उद्ध्वस्त : ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त, महिलांचा पुढाकारमनोज मानतकर। लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली. या कारवाईत ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दारूबंदीसाठी स्त्रियांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यसाठी महिला ठाणेदारांनी घेतलेला पुढाकार यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील बिअरबार, वाईन शॉप बंद झाल्याने गावठी दारू विक्रेत्यांना उधाण आले असून खेडोपाडी जणू काही दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने गावठी दारूला लगाम लावण्यासाठी नांदगावच्या महिला ठाणेदार रीता उईके यांच्या मार्गदर्शनात महिलांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका घेत जनजागृती सुरू केली होती. तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये गावठी दारूमुळे शांतता भंग पावत असून वातावरण दूषित झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने याला आळा घालण्यासाठी नांदगावच्या ठाणेदार रीता उईके यांनी शिवणी गावात महिलांची बैठक घेतली व दारूबंदीसाठी महिलांना एकजूट करून आठवडाभरात शेकडो पिंप गावठी दारू उद्ध्वस्त केली. हजारो रुपयांचा मुद्देमालही नांदगावातील ओंकारखेडा परिसरातील पारधी बेड्यावरून जप्त केला. शिवणीतील महिलांनी ठाणेदारांसमवेत परिसरातील नदीलगतच्या तसेच गावानजीकच्या गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्यामुळे दारूविक्रेते धास्तावले असून गावठी दारू काढण्यासाठी दारूविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. दारूबंदी विरोधातील महिला रात्रंदिवस गाठवी दारू काढण्याच्या स्थळांचा शोध घेत असल्याने दारूविक्रेत्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत आहे. दारूबंदीसाठी शिवणीतील महिलांनी एल्गार पुकारला असून सीता मरगडे, उज्ज्वला देशमुख, मीरा शेंडे, छबू कापडे, मंगला बुरे, महानंदा बुरे, कुसूम मारबदे, कुसूम मेश्राम, सुनंदा पंचबुद्धे, बेबी केवट, शोभा तऱ्हेकर, पुष्पा मेश्राम, इंदिरा शेंडे, पंचफुला शिंदे यांच्यासह शेकडो महिला दारूबंदी होण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. शिवणीत होणार दारूबंदीचा ठरावशासनाने शेतकरीहितार्थ निर्णय घ्यावा, यासाठी ज्या शिवणी गावातून आंदोलनाची ठिणगी पेटली, त्याच गावातून आता दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत व लवकरच दारूबंदीचा ठरावसुद्धा ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच मधुकर कोठाळे यांनी सांगितले. महिलांची साथ लाभल्यास अवैधरीत्या सुरू असलेली गावठी दारू पूर्णपणे बंद होणे शक्य होईल. कारण पोलीस प्रशासन तर आपले कार्य करीतच आहे. परंतु, आपले संसार उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी महिलांनीसुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे. - रीता उईके, ठाणेदार