पोलीस प्रशासन हतबल : एकाच दिवशी चार तक्रारी दाखल अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागात विवाहितांच्या छळाची प्रकरणे वाढली असून शनिवारी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. घरगुती कारणे व हुंड्याच्या मागणीवरून विवाहित महिलांचे शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे दररोज दाखल होणाऱ्या तक्रारीवरून निदर्शनास येत आहे. अशा कौटुंबिक वादाच्या तक्रारीमुळे पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत कौटुंबिक वादाच्या तक्रारी दररोज दाखल होत असून महिलांचे विनयभंग व हुंड्याच्या मागणीवरून महिलांवर अत्याचार होत आहेत. चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत मोरगड येथील रहिवासी २७ वर्षीय विवाहितेला पती रवी कास्देकर, संतू कास्देकर व वुगई यांनी माहेरहून पैसे आणण्याचा तकादा लावून छळ केल्याची तक्रारी शनिवारी चिखलदरा ठाण्यात दाखल झाली. दुसरी घटना दर्यापूर ठाण्यांतर्गत दारापुरात उघडकीस आली. तेथील रहिवासी २१ वर्षीय विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यास सासरच्या मंडळींनी तगादा लावल्याचे तक्रारीत नमूद आहे. पती फिरोज शह रहेमत शहा, रहेमत शहा शेरुशहा व रईसाबानोविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. तिसरी घटना वरुड ठाण्यांतर्गत घडली. शहापूर येथील रहिवासी २५ वर्षीय विवाहितेच्या घरात प्रवेश करून आरोपी भिरेंद्र राजू धावसे (२२) याने विनयभंग केल्याची तक्रार आहे. चौथी घटना माहुली जहांगीर ठाण्याच्या हद्दीत घडली. तेथील एका विवाहितेचा घरगुती कारणावरून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अतुल गोपाळ खेडकर (दस्तापूर) व अन्य तीन जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणशहरातील विविध परिसरात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश पालकवर्ग अशा कृत्यांना लपविण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी शहरात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनाही अनेक घडल्या असून काही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचेही प्रकार उघड झाले आहेत.
ग्रामीण भागात विवाहित महिलांवर अत्याचार वाढले
By admin | Updated: August 25, 2015 00:30 IST