शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ‘एटीसी’ दोषी

By admin | Updated: February 20, 2017 00:07 IST

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांना दोषी ठरवीत...

नागपुरात गुन्हे दाखल : महाविद्यालयाचे संचालकही आरोपीच्या पिंजऱ्यातअमरावती : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांना दोषी ठरवीत नागपुरात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांची कागदपत्रे मिळवून बनावट नोंदी करीत विविध अभ्यासक्रमाला त्यांचा प्रवेश दाखवायचा आणि सरकारकडून त्यांच्या नावाने मिळणारी शिष्यवृत्ती हडपायची, असे शेकडो प्रकार उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी)कडे सोपविली होती. एसआयटीने आतापर्यंत २८८ संस्थामधील १ हजार ४१५ कोटींचा गैरव्यवहार अधोरेखित केला आहे. शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात देवराम रुपचंद मरस्कोल्हे (रा. सडकअर्जुनी, जि.गोंदिया) यांच्या तक्रारीवरून अपर आयुक्त गिरीश सरोदे व विवेकानंद महाविद्यालयाचे संचालक भरत पोकुलवार यांना आरोपी बनविले आहे.सरोदे हे नागपूर येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकार कार्यरत असताना शिष्यवृत्तीत घोटाळा झाल्याचे तपासाअंती एसआयटीने स्पष्ट केले आहे. प्राप्त माहितीनुसार, ३२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करुन आरोपी भारत पोकुलवार याने प्रत्येकी २२ हजार ६०५ रुपये याप्रमाणे लाखोंची शिष्यवृत्ती २०१२-१३ मध्ये हडपली. पोकुलवारला या गैरव्यवहारात अदिवासी विकास विभागाचे अमरावतीचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी मदत केल्याचा आरोप आहे. त्यावरुन पोलिसांनी सरोदे, पोकुलवार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गत दोन महिन्यात नागपुरात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्र्वी बजाजनगर आणि जरीफटका ठाण्यात असे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम आणि आणि उपायुक्त (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती अनेक संस्थाचालकांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे लागली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)शासनाला अमरावतीत सक्षम ‘एटीसी’ मिळेना?राज्य शासनाने येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तपदी गिरीश सरोदे यांच्या नियुक्तीपत्रात प्रशासकीय सेवेतील सक्षम अधिकाऱ्यांची पदस्थापना होईस्तोवर नियुक्ती करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. खरे तर अमरावती एटीसी कार्यालयाचा कारभार हा १२ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. येथे आयएएस अधिकारी नेमण्यात यावे, अशी विविध आदिवासी संघटनांची मागणी आहे. मात्र विदर्भातील एका बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सरोदे हे एटीसीपदी कायम आहेत.जिल्ह्यातील संस्थाही रडारवरविद्यार्थ्यांची कागदपत्रे जुळवून त्याआधारे शिष्यवृत्ती हडपणाऱ्या शैक्षणिक संस्थाचालकांची उलटी गिणती सुरू झाली आहे. यात काही संस्था जिल्ह्यातील असून लवकरच संस्थाचालक, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.