शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सहायक कामगार आयुक्तांनी झटकली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

०० एकरांत उभा होत असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामकाजात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज, हॅन्ड ग्लोव्ज यांसारख्या प्राथमिक बाबींपासून त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, अशा साधनांची येथे उणीव आहे. कामगार जोखीम पत्करून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संबंधित कंपनी व कंत्राटदाराने कामगारांच्या जीविताशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. ‘

ठळक मुद्देवॅगन दुरुस्ती कारखाना, कामगारांच्या जीविताशी खेळ, रेल्वे प्रशासनाकडून कंत्राटदाराला अभय

  श्यामकांत सहस्त्रभोजने    लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणीत  कामगारांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले. त्यावर सदर प्रकल्प आमच्या अखत्यारीत नसल्याचे बोलून सहायक कामगार आयुक्तांनी कामगारांच्या जीविताची जबाबदारी झटकली. यामुळे आता कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचा वाली कोण,  हा प्रश्न विकासाच्या वाटचालीतील काटे अधोरेखित करणार ठरला आहे.          २०० एकरांत उभा होत असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामकाजात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज, हॅन्ड ग्लोव्ज यांसारख्या प्राथमिक बाबींपासून त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, अशा साधनांची येथे उणीव आहे. कामगार जोखीम पत्करून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संबंधित कंपनी व कंत्राटदाराने कामगारांच्या जीविताशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. ‘लोकमत’ने याची दखल घेत वृत्त प्रकाशित केल्यानंतर सुरक्षेसंबंधी प्रशासकीय हालचाली गतिमान होण्याची अपेक्षा असताना, सहाय्यक कामगार आयुक्तांनी सदर प्रकल्प केंद्राचा असल्याचे सांगून जबाबदारीतून स्वत:ला वेगळे केले. या गोरगरीब कामगारांना सुरक्षा कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.  कंपनी व प्रशासनाचे असेच धोरण राहिल्यास कामगारांना नाहक दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. वॅगन दुरुस्ती कारखाना उभारणीसाठी ज्या कंपनीला शासनाने नेमले, त्यांच्या कामकाजावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह यातून उभा ठाकले आहे. शासनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. कामगार संघटनांनादेखील याकडे लक्ष द्यावे लागेल. कंपनी व कंत्राटदाराला बेजबाबदारपणाबाबत दंड का केले जाऊ नये, असा सवालदेखील शहरवासीयांमध्ये आता चर्चेत आला आहे.

प्रकल्पाला गती द्या वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणीचे काम कासवगतीने सुरू आहे. ज्या कंपनीकडे सदरचे काम देण्यात आले, ती कंपनी आस्ते कदम काम करीत असल्याची ओरड शहरवासीयांमध्ये आधीचीच आहे. या वॅगन दुरुस्ती कारखान्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळू शकेल. त्याची उत्सुकता बेरोजगार तरुणांना तसेच त्यांच्या पालकांना लागली आहे. यामुळे कंपनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासन व प्रशासनानेदेखील तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे