शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल

By admin | Updated: September 23, 2015 00:26 IST

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे.

शासनाने सोडले वाऱ्यावर : लोकप्रतिनिधी करतात नौटंकीअचलपूर : श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे. सध्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे जलधारांनी स्वागत करणारा वरुणदेव रुसला आहे. परतीच्या पावसाने मनसोक्त हजेरी लावली नसल्याने किती पीक हाती येते? त्याला भाव काय मिळतो व त्यातून लावलेला खर्च तरी निघतोय का, याचाच विचार सध्या शेतकरी करीत आहेत. संकटाचा मुकाबला करणाऱ्या बळीराजाला आता त्याच्या कुटुंबाची चिंता सतावत आहे.सर्व सणांवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. वास्तव परिस्थितीतही शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या सर्जा-राजाचा सण पोळा नुकताच साजरा केला. पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. मात्र यावर्षी पिकांची स्थिती बिकट असल्याने त्यांचा पोळा दारिद्र्यातच गेले. अचलपूर-परतवाड्यात अतिवृष्टी, वादळ, गारपीट अशी स्थिती मागील चार- पाच वर्षांपासून अचलपूर तालुल्यातील शेतकरी अनुभवत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: डबघाईस आला आहे.बाप्पांना साकडेसततच्या नापिकीने झालेल्या कर्जाला कंटाळून गेल्या १४ वर्षांत अचलपूर तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सन २००२ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुरुवात झाली होती. काही आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या होत्या. अजूनही अस्मानी संकट घोंगावत आहे. शेतकरी दोन हात करीत लढाई लढत आहे. गणेश चतुर्थीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशीपासून पावसाने पुन्हा दडी मारली. गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहेत. गणेशोत्सवात पावसाने समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला. सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असल्याने गणेशोत्सवात अपेक्षित उत्साह दिसत नाही. निसर्गाने मारले, राजकारण्यांनी दुष्काळाचे भांडवल करून स्वत:ची पोळी शेकत आहेत. शासनाने वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांचे लेकरु म्हणून मत मागणारे फिरकेनासे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)