शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल

By admin | Updated: September 23, 2015 00:26 IST

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे.

शासनाने सोडले वाऱ्यावर : लोकप्रतिनिधी करतात नौटंकीअचलपूर : श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे. सध्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे जलधारांनी स्वागत करणारा वरुणदेव रुसला आहे. परतीच्या पावसाने मनसोक्त हजेरी लावली नसल्याने किती पीक हाती येते? त्याला भाव काय मिळतो व त्यातून लावलेला खर्च तरी निघतोय का, याचाच विचार सध्या शेतकरी करीत आहेत. संकटाचा मुकाबला करणाऱ्या बळीराजाला आता त्याच्या कुटुंबाची चिंता सतावत आहे.सर्व सणांवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. वास्तव परिस्थितीतही शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या सर्जा-राजाचा सण पोळा नुकताच साजरा केला. पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. मात्र यावर्षी पिकांची स्थिती बिकट असल्याने त्यांचा पोळा दारिद्र्यातच गेले. अचलपूर-परतवाड्यात अतिवृष्टी, वादळ, गारपीट अशी स्थिती मागील चार- पाच वर्षांपासून अचलपूर तालुल्यातील शेतकरी अनुभवत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: डबघाईस आला आहे.बाप्पांना साकडेसततच्या नापिकीने झालेल्या कर्जाला कंटाळून गेल्या १४ वर्षांत अचलपूर तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सन २००२ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुरुवात झाली होती. काही आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या होत्या. अजूनही अस्मानी संकट घोंगावत आहे. शेतकरी दोन हात करीत लढाई लढत आहे. गणेश चतुर्थीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशीपासून पावसाने पुन्हा दडी मारली. गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहेत. गणेशोत्सवात पावसाने समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला. सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असल्याने गणेशोत्सवात अपेक्षित उत्साह दिसत नाही. निसर्गाने मारले, राजकारण्यांनी दुष्काळाचे भांडवल करून स्वत:ची पोळी शेकत आहेत. शासनाने वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांचे लेकरु म्हणून मत मागणारे फिरकेनासे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)