शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गुणवत्तेसाठी २८०० शाळांमध्ये मूल्यमापन चाचणी

By admin | Updated: October 19, 2016 00:13 IST

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ जिल्हाभरातील शाळांमध्ये १९ व २० आॅक्टोबरला पार पडणार आहे.

आज परीक्षा : शिक्षण विभागात तयारी पूर्ण अमरावती : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ जिल्हाभरातील शाळांमध्ये १९ व २० आॅक्टोबरला पार पडणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीचे साधारण ४ लाख ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सन २०१५-१५ पासून सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यापैकीच संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा हा एक उपक्रम आहे. शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादीत केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. १९ आॅक्टोबर रोजी प्रथम भाषा व २० आॅक्टोबर रोजी गणित याविषयाची परीक्षा होणार आहे. विशेष बाब म्हणजे राज्यस्तरावरुनच या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील पहिली ते आठवीचे जवळपास साडेचार लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागातर्फे या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून वाचन, लेखन, आकलन व उपयोजन तसेच संख्या ज्ञान व बेरीज यात एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, यासाठी ही चाचणी दिशादर्शक ठरणार आहे. हे विद्यार्थी देणार चाचणी : जिल्हाभरातील शाळांमध्ये इयत्ता १ ते ८ च्या विद्यर्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीत मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी चाचणी देणार आहेत.(प्रतिनिधी)वर्षभरात तीन चाचण्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत वर्षभरातील तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना आहेत. त्यानुसार २८ व २९ जुलै रोजी पायाभूत चाचणी पार पडली, आता संकलित मूल्यमापन चाचणी १ झाल्यानंतर सत्राच्या अखेरीस चाचणी पार पडेल.क्षमतेची होणार खात्री नियमित विद्यार्थ्यांना किमान अपेक्षित क्षमता अवगत असणे आवश्यक आहे. यासाठी संकलित मूल्यमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समज व क्षमतेची खात्री या चाचणीमुळे होईल या चाचणीतील गुणवत्तेच्या आधारे शाळेलाही श्रेणी दिली जाणार आहे.