शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बारावीचे मूल्यांकन आटोपले, राज्य मंडळाकडे आज गुण पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग ...

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी मू्ल्यांकनाचे कार्य आटोपले असून, कनिष्ठ विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाठविलेले गुण हे राज्य मंडळाकडे शुक्रवारी संकेतस्थळावर ऑनलाईन पाठविले जाणार आहे.

ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, अशी आता दहावीनंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने कोरोना काळातही कनिष्ठ विद्यालयातून बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ऑनलाईन गुणदान मागविले आहे. कनिष्ठ विद्यालयांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावीचे ३० टक्टे, अकरावीचे ३० टक्के तर बारावीचे ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार द्यावे लागले. त्यानुसार प्रत्येक कनिष्ठ विद्यालयाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुणदान केले आहे. अमरावती विभागात बारावीचे एकूण १ लाख ३८ हजार ३७० विद्यार्थी संख्या आहे.

------------------

असे आहे विभागात बारावीचे विद्यार्थी

अकोला :२४८१६

अमरावती : ३५१४६

बुलडाणा : ३१०४२

यवतमाळ : २९१८४

वाशिम :१८१८२

-----------------

कोट

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर, पावसामुळे थोडा विलंब झाला. मात्र, शुक्रवारी कनिष्ठ विद्यालयांकडून मिळालेले गुण राज्य मंडळाकडे ऑनलाईन पाठविले जातील. साधारणत: ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.