शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे मूल्यांकन आटोपले, राज्य मंडळाकडे आज गुण पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग ...

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी मू्ल्यांकनाचे कार्य आटोपले असून, कनिष्ठ विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाठविलेले गुण हे राज्य मंडळाकडे शुक्रवारी संकेतस्थळावर ऑनलाईन पाठविले जाणार आहे.

ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, अशी आता दहावीनंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने कोरोना काळातही कनिष्ठ विद्यालयातून बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ऑनलाईन गुणदान मागविले आहे. कनिष्ठ विद्यालयांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावीचे ३० टक्टे, अकरावीचे ३० टक्के तर बारावीचे ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार द्यावे लागले. त्यानुसार प्रत्येक कनिष्ठ विद्यालयाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुणदान केले आहे. अमरावती विभागात बारावीचे एकूण १ लाख ३८ हजार ३७० विद्यार्थी संख्या आहे.

------------------

असे आहे विभागात बारावीचे विद्यार्थी

अकोला :२४८१६

अमरावती : ३५१४६

बुलडाणा : ३१०४२

यवतमाळ : २९१८४

वाशिम :१८१८२

-----------------

कोट

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर, पावसामुळे थोडा विलंब झाला. मात्र, शुक्रवारी कनिष्ठ विद्यालयांकडून मिळालेले गुण राज्य मंडळाकडे ऑनलाईन पाठविले जातील. साधारणत: ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.