शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत ...

ठळक मुद्देबच्चूकडू : तिवस्यात जाहीर सभा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत चौकात आ. बच्चू कडू यांची जाहीर सभा बुधवारी सकाळी पार पडली. जाहीर सभेच्या व्यासपीठावर प्रहार जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मनोज अंबलकर, गझलकार नितीन देशमुख, प्रमोद कुदळे, अतुल खुपते, गजू कुबडे, प्रवीण हेंडवे, मंगेश देशमुख, बल्लू जवंजाळ, तिवसा तालुकाप्रमुख गजू कडू, संघटक राज माहोरे यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील प्रमुख उपस्थित होते. आसूड यात्रेला व सभेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेकडो वाहनांतून हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.आसूड सभेची भूमिका मांडताना आ.बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. अलीकडच्या १२ वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याच सुमारास २००६ मध्ये स्वामिनाथन आयोग स्थापन झाला. मात्र, अजूनही त्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत. आता सत्ता नसताना तेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हल्लाबोल करतात. म्हणजेच काँग्रेस असो की भाजपचे सरकार, शेतकऱ्यांचे कुठलेही घेणे-देणे या सत्ताधाऱ्यांना नाही. भाजप सरकारने अपघात विमा व पीकविम्यातून कंपन्यांचे खिसे भरले. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम ठेवण्याचे काम आता 'प्रहार' करणार आहे. शेतकऱ्यांप्रति तळमळ ठेवून या आसूड यात्रेतून शेतकरी, जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही पार पाडू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे सभास्थळ खचाखच भरले होते.चांदूर रेल्वेमार्गे 'आसूड' यात्रायवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथून आसूड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंगळवारी रात्री ११ वाजता चांदूर रेल्वे मार्गाने ही आसूड यात्रा तिवसा तालुक्यात दाखल झाली. कुऱ्हा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत मुक्काम ठोकला. सकाळी आ. बच्चू कडू यांनी महासमाधीचे दर्शन घेतले. ही यात्रा अमरावती-नागपूर महामार्गाने बुधवारी सकाळी ११ वाजता तिवसा नगरपंचायतजवळ पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली.पोटाचा प्रश्न मिटलेला नाही; शौचालयाची सक्तीशेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण, आज ऊसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात असल्याची टीका आ.कडू यांनी केली.