शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अश्विनी तायडेंची उमेदवारी न्यायालयात रद्द

By admin | Updated: July 23, 2015 00:09 IST

अचलपूर बाजार समितीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांची उमेदवारी आज ...

खळबळ : अचलपूर बाजार समिती निवडणूक, दोन उमेदवार रिंगणात अचलपूर : अचलपूर बाजार समितीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांची उमेदवारी आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरविल्याने सहकार गटात खळबळ उडाली आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील सहकार पॅनलच्या उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांनी एप्रिल २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न कोटींवर असल्याचा दाखला जोडला होता. त्यानंतर चार महिन्यांनी बाजार समिती निवडणुकीत केवळ २० हजार रूपयांचे उत्पन्न व ४५ आर. शेतजमीन दाखविली. याविरोधात अपक्ष उमेदवार कुलदीप प्रभाकर काळपांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधकांकडे तशी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर त्यांनी आपला योग्य निर्णय दाखविला. पुन्हा काळपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामध्ये स्वत:चा रद्द झालेला उमेदवारी अर्ज योग्य ठरविला. न्यायालयाने तसे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या न्यायालयाने अश्विनी प्रवीण तायडे यांची मालमत्ता अधिक आहे. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात त्या बसत नाहीत. त्यामुळे खऱ्या उमेदवारावर अन्याय होणार असल्याची बाजू वकिलांनी मांडली. त्यावर अश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)सहकार क्षेत्रात खळबळअश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द झाल्याने सहकार पॅनलमध्ये खळबळ उडाली आहे. २६ जुलै रोजी बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान होऊ घातले आहे. अशातच सहकार पॅनलला जोरदार हादरा बसला आहे. अश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द झाल्याने ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात आता समता पॅनलचे सुधीर शेषराव रहाटे व याचिकाकर्ता उमेदवार कुलदीप प्रभाकर काळपांडे अशी दुहेरी तुल्यबळ लढत होणार की कुलदीप काळबांडे अविरोध निवडून येणार, याबाबत चर्चा सुरू आहेत. रहाटेंबाबत उद्या निर्णयआर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील समता पॅनलचे उमेदवार सुधीर रहाटे यांच्या विरुद्धच्या याचिकेवर उद्या २३ जुलै रोजी नागपूर खंडपीठात निर्णय होणार आहे. त्यांनी उत्पन्नाचे दोन दाखले जोडल्याने त्याचे स्पष्टीकरण दाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांनी हजर राहून दिले. कुलदीप काळपांडे यांच्या बाजूने विधिज्ञ एम.पी. खारिया, महेश देशमुख व निकेश धोपे यांनी कामकाज पाहिले.