शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 15:32 IST

ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.

अमरावती : हिंदीत एक म्हण आहे 'मरता क्या न करता?' राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो. मेळघाटच्या हतरू येथील सरपंच व उपसरपंच यांनी तोच प्रयोग सोमवारी केला. तब्बल नऊ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचे पत्र दाखल केले. त्याबाबत निर्णय ग्रामसभेत २७ जानेवारी तारखेला होईल. परंतु, पराभव दिसू लागताच प्रहारमध्ये प्रवेश केल्याची एकच चर्चा तालुक्यात रंगली आहे.

अतिदुर्गम व तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. २७ जानेवारी रोजी त्यावर ग्रामसभेत निर्णय घेणार आहे. सरपंच, उपसरपंचांची खुर्ची हलल्याने हालचालींना वेग आला आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच सदस्यांची मुस्कटदाबी करीत असल्याने पायउतार वजा घरी जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे. गांगरखेडा, मेहरीआम येथील कित्ता हतरू येथे गिरवला जाणार का, अशी विचारणा होत आहे.

सदस्यांची पळवापळवी?

चिखलदरा तहसील कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल होताच सीताराम अखंडे, बाबूलाल बेठेकर, भैयालाल मावस्कर, बापूराव कासदेकर, अनिता सेलूकर, पिनू मावस्कर, सारिका काकडे, प्यारी बेठेकर, भुरय भुसुम असे सर्व सदस्य गावातून बेपत्ता आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी शोध घेऊन त्यांना आर्थिक आमिषही दाखविले. परंतु, त्यांच्यापुढे नन्नाचा पाढा संतप्त सदस्यांनी वाचला.

राजाश्रय वाचविणार का?

सरपंच, उपसरपंचांनी सोमवारी प्रहार संघटनेत पडती बाजू पाहता प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, विधानसभेत त्यांचा कौल भाजप उमेदवाराच्या बाजूने होता. ग्रामपंचायतीमध्ये केलेला कारनामा पाहता आदिवासी प्रचंड विरोधात आहेत. त्यामुळे सदस्यांच्या ओढाताणीत राजकीय राजाश्रय त्यांना वाचविणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. सर्वांच्या नजरा त्याकडे खिळलेल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण