शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

अरुण साधूंचे होते अमरावतीशी नाते, परतवाड्यात झाला होता जन्म 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 18:52 IST

- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ -  पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झाला. चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परतवाडा नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या सायन्सस्कोर हायस्कूल, ...

- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ -  पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झाला. चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परतवाडा नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या सायन्सस्कोर हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालयात त्यांनी घेतले. अरूण साधू यांचे वडील मार्तण्डराव साधू परतवाडा येथील विदर्भ मिलमध्ये ‘पिनिंग मास्तर’ पदावर कार्यरत होते. विदर्भ मील परिसरातील निवासस्थानात त्यांचे वास्तव्य होते. मील बंद पडल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यानंतर अरूण यांचे वडील मार्तण्डराव हे परतवाडा येथील जयस्तंभ चौकानजीकच्या धर्माधिकारी वाड्यात वास्तव्याला गेले. त्यांचे येथील घर आता नामशेष झाले आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी अमरावती येथील सायन्सस्कोर शाळेत अरूण साधूंनी प्रवेश घेतला. विदर्भ महाविद्यालयात ते बी.एस्सी.पर्यंत शिकले. एका विषयात ते अनुत्तीर्ण झाले होते. त्यावर्षी त्यांनी जामठी (माना) येथे एका शाळेत शिक्षकाची नोकरीही केली. 

पोहण्यात तरबेज अरूण साधू आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे हे आत्ये-मामेभाऊ. या दोघांची खास मैत्री होती. ते दररोज सायंकाळी पोहण्यासाठी श्री हव्याप्र मंडळात जात असत, अशी आठवण सुरेश देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. अमरावतीतील अशोक गोखले, कर्नल अरूण जोशी यांच्याशीदेखील त्यांची मैत्री होती. 

मुगलाईपुऱ्यातील वाचनालयात केले वाचन परतवाडास्थित मुगलाईपुºयाला लागून असलेल्या सार्वजनिक वाचनालयात अरुण साधू नेहमी जात असत. तेथूनच त्यांना वाचनाचा व्यासंग जडल्याचे ज्येष्ठ वैदर्भीय हास्यकवी राजाभाऊ धर्माधिकारी यांनी सांगितले.

शेवाळकर-साधू कुटुंबाची जवळीकज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर अचलपूर येथील रहिवासी असल्याने अरूण साधू यांची त्यांच्या माळवेशपुºयातील घरी सतत ये-जा असायची. दोघांनाही साहित्याची आवड असल्याने साहित्यावर प्रदीर्घ चर्चा रंगत असे. अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. परंतु त्यांचे कार्य अविस्मरणीय राहणार असल्याचे मत दिवंगत राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.