शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:24 IST

शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही.

ठळक मुद्देतीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त। पाणीपातळी खोल, उपशावर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. उपाययोजना सूचविल्या गेल्या; मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांची परवड होत आहे.नगरपंचायत व तालुका प्रशासनानुसार, शहर परिसरातील भूगर्भात मुबलक पाणी आहे. स्थानिक नगरपंचायतने शहरवासीयांसाठी १७ प्रभागांत १७ बोअरवेल केल्या. मात्र, तूर्तास तीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त झाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५ हजार आहे. ती आता २५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलच्या माध्यमातून होणाºया पाणीपुरवठ्यासाठी १८०० नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली आहे. यंदा सर्वच भागात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअरच्या दैनंदिन उपशास मर्यादा आल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये खाली सोडाव्या लागत आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने जुन्या मोटर अधिक दाबाने पाणी खेचू शकत नाही. तेथे नवीन मोटर लावण्याची गरज आहे. मात्र, त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नळ आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.पाणीपट्टी कर नियमित भरत असताना आमच्याच नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवाल धारणीकर विचारू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही, असे ठेवणीतील उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना दिले जात आहे.नगरपंचायत प्रशासनाकडून नियोजन कागदोपत्रीनगरपंचायत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भातील नियोजन कागदोपत्री केले. पाणीटंचाई निवारणार्थ १४ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, मे महिना संपत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पंचायतीचे नियोजन बारगळले आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यास नवीन मोटर खरेदी केल्या जातील.- सूर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी, धारणी 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई