शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:24 IST

शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही.

ठळक मुद्देतीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त। पाणीपातळी खोल, उपशावर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. उपाययोजना सूचविल्या गेल्या; मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांची परवड होत आहे.नगरपंचायत व तालुका प्रशासनानुसार, शहर परिसरातील भूगर्भात मुबलक पाणी आहे. स्थानिक नगरपंचायतने शहरवासीयांसाठी १७ प्रभागांत १७ बोअरवेल केल्या. मात्र, तूर्तास तीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त झाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५ हजार आहे. ती आता २५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलच्या माध्यमातून होणाºया पाणीपुरवठ्यासाठी १८०० नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली आहे. यंदा सर्वच भागात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअरच्या दैनंदिन उपशास मर्यादा आल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये खाली सोडाव्या लागत आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने जुन्या मोटर अधिक दाबाने पाणी खेचू शकत नाही. तेथे नवीन मोटर लावण्याची गरज आहे. मात्र, त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नळ आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.पाणीपट्टी कर नियमित भरत असताना आमच्याच नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवाल धारणीकर विचारू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही, असे ठेवणीतील उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना दिले जात आहे.नगरपंचायत प्रशासनाकडून नियोजन कागदोपत्रीनगरपंचायत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भातील नियोजन कागदोपत्री केले. पाणीटंचाई निवारणार्थ १४ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, मे महिना संपत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पंचायतीचे नियोजन बारगळले आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यास नवीन मोटर खरेदी केल्या जातील.- सूर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी, धारणी 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई