शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:24 IST

शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही.

ठळक मुद्देतीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त। पाणीपातळी खोल, उपशावर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. उपाययोजना सूचविल्या गेल्या; मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांची परवड होत आहे.नगरपंचायत व तालुका प्रशासनानुसार, शहर परिसरातील भूगर्भात मुबलक पाणी आहे. स्थानिक नगरपंचायतने शहरवासीयांसाठी १७ प्रभागांत १७ बोअरवेल केल्या. मात्र, तूर्तास तीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त झाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५ हजार आहे. ती आता २५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलच्या माध्यमातून होणाºया पाणीपुरवठ्यासाठी १८०० नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली आहे. यंदा सर्वच भागात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअरच्या दैनंदिन उपशास मर्यादा आल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये खाली सोडाव्या लागत आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने जुन्या मोटर अधिक दाबाने पाणी खेचू शकत नाही. तेथे नवीन मोटर लावण्याची गरज आहे. मात्र, त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नळ आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.पाणीपट्टी कर नियमित भरत असताना आमच्याच नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवाल धारणीकर विचारू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही, असे ठेवणीतील उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना दिले जात आहे.नगरपंचायत प्रशासनाकडून नियोजन कागदोपत्रीनगरपंचायत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भातील नियोजन कागदोपत्री केले. पाणीटंचाई निवारणार्थ १४ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, मे महिना संपत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पंचायतीचे नियोजन बारगळले आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यास नवीन मोटर खरेदी केल्या जातील.- सूर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी, धारणी 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई