शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:21 IST

शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

कांद्याची दामदुप्पट भावाने विक्री : ग्राहकांना धरले वेठीसअमरावती : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे. सामान्य ग्राहक मात्र चांगलाच वेठीस धरला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी एवढी दबंगगिरी वाढली की अनेक प्रकारच्या भाजीपालामध्ये दीडसे ते चारशे टक्के एवढा नफा कमावला जात आहे. त्यामुळे महागईच्या काळात भाजीपाल्यांचे भाव चांगलीेच वधरल्यामुळे व हे भाव मनमर्जीने वाढविल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. कांदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. गुरुवारी अमरावती बाजार समितीत फेरफटका मारला असता बुधवारी पांढऱ्या कांद्याची आवक, ३००किंटल एवढी झाली होती. या कांद्याला किंटलमागे कमीत कमी ४०० रुपये व जास्तीत जास्त ६००रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक १००किंटल झाली तर हा कांद्याला ठोक भावात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. परंतु हर्रास झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते संगनमताने भाववाढ करून ठोकमध्ये ४ रुपये, तर चिल्लर भाव १० ते १२ रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची ही शुध्द लूट असून यातून चिल्लर भाजीपाला दीडशे ते दोनशे पट एवढा नफा कमावला जात आहे. अमरावतीत ५०० च्या वर किरकोळ भाजीविक्रेते आहेत. ६०० ते ७०० फेरीवाले भाजीेपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यवसायातून रोज कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री होते. जर अशाप्रकारे भाजीपाला विक्रेत्यांकडून कृत्रिम लूट होत असेल तर यावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पडत आहे. मात्र जो शेतकरी काबाडकष्ट करून माल पिकवितो. त्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नाही. व्यापारी त्याचा भाव पाडतात. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल होत आहे व दुसरीकडे मोठे व्यापारी भाव पाडण्याचा घाट रचत आहेत. दुसरीकडे भाजीविक्रे ते प्रंचड भाववाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा गोरखधंदा करीत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे नागरिकांना दामदुप्पट भाव देऊन तो विकत घ्यावाच लागतो. त्यामुळे विक्रेते याचा गैरफायदा घेत आहेत.२ग्रामीण भागातील कांद्याला मागणी कांदेयाची आवक सध्या चांगली आहे. पूर्वी नाशिकचा कांदा यायचा. आता अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार, अचलपूर भागातील कांदा अमरावतीत दाखल होत आहे. पांढऱ्या कांद्याची ३०० किंटल तर लाल कांद्याची १०० क्विंटल रोज आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याची ओरड आहे.