शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:21 IST

शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

कांद्याची दामदुप्पट भावाने विक्री : ग्राहकांना धरले वेठीसअमरावती : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे. सामान्य ग्राहक मात्र चांगलाच वेठीस धरला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी एवढी दबंगगिरी वाढली की अनेक प्रकारच्या भाजीपालामध्ये दीडसे ते चारशे टक्के एवढा नफा कमावला जात आहे. त्यामुळे महागईच्या काळात भाजीपाल्यांचे भाव चांगलीेच वधरल्यामुळे व हे भाव मनमर्जीने वाढविल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. कांदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. गुरुवारी अमरावती बाजार समितीत फेरफटका मारला असता बुधवारी पांढऱ्या कांद्याची आवक, ३००किंटल एवढी झाली होती. या कांद्याला किंटलमागे कमीत कमी ४०० रुपये व जास्तीत जास्त ६००रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक १००किंटल झाली तर हा कांद्याला ठोक भावात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. परंतु हर्रास झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते संगनमताने भाववाढ करून ठोकमध्ये ४ रुपये, तर चिल्लर भाव १० ते १२ रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची ही शुध्द लूट असून यातून चिल्लर भाजीपाला दीडशे ते दोनशे पट एवढा नफा कमावला जात आहे. अमरावतीत ५०० च्या वर किरकोळ भाजीविक्रेते आहेत. ६०० ते ७०० फेरीवाले भाजीेपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यवसायातून रोज कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री होते. जर अशाप्रकारे भाजीपाला विक्रेत्यांकडून कृत्रिम लूट होत असेल तर यावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पडत आहे. मात्र जो शेतकरी काबाडकष्ट करून माल पिकवितो. त्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नाही. व्यापारी त्याचा भाव पाडतात. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल होत आहे व दुसरीकडे मोठे व्यापारी भाव पाडण्याचा घाट रचत आहेत. दुसरीकडे भाजीविक्रे ते प्रंचड भाववाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा गोरखधंदा करीत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे नागरिकांना दामदुप्पट भाव देऊन तो विकत घ्यावाच लागतो. त्यामुळे विक्रेते याचा गैरफायदा घेत आहेत.२ग्रामीण भागातील कांद्याला मागणी कांदेयाची आवक सध्या चांगली आहे. पूर्वी नाशिकचा कांदा यायचा. आता अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार, अचलपूर भागातील कांदा अमरावतीत दाखल होत आहे. पांढऱ्या कांद्याची ३०० किंटल तर लाल कांद्याची १०० क्विंटल रोज आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याची ओरड आहे.