शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवातून कला, संस्कृती, विविधतेचे जतन

By admin | Updated: March 2, 2017 00:09 IST

देशाला समृध्द संस्कृतीचा वारसा लाभला आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे संवर्धन, जतन व विकास करण्यासाठी पर्यटन महोत्सवात नागरिकांनी सहभागी होणे ...

जे. पी. गुप्ता : विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये महोत्सवाचे होणार आयोजनअमरावती : देशाला समृध्द संस्कृतीचा वारसा लाभला आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे संवर्धन, जतन व विकास करण्यासाठी पर्यटन महोत्सवात नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी मांडले. नुकत्याच पार पडलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय समारंभात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. याप्रसंगी चिखलदरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, उपाध्यक्ष रेशमा परविन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी राहुल करडीले, तहसिलदार सैफान नदाब, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशांत सवई आणि पर्यटन महोत्सवाचे समन्वयक प्रवीण येवतीकर उपस्थित होते.पुढे बोलताना गुप्ता म्हणाले, पर्यटकांची पहिली पसंती चिखलदरा असून येथे रोजगार निर्मिती, पर्यटकांना माफक दरात निवासाची व्यवस्था, साहसी खेळांबाबतचे नियोजन व दिवस, रात्री मुक्कामी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी उत्कृष्ट सुविधा देता यावी, यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रभावी नियोजन करण्यात येईल. गत तीन वषार्पासून चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात नाविन्य आणण्याचा नेहमी प्रयत्न सुरु आहे. दुरदुरून येणाऱ्या पर्यटकाकरीता आवश्यक सोयी-सुविधा, पर्यटकांना खिळवून ठेवणाऱ्या नवनविन बाबींचा समावेश लवकरच करण्यात येईल. चिखलदरा पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यात येणार असून विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक राजेंद्रसिंह सोमवंशी, संचालन संदीप सावरकर, आभार प्रवीण येवतीकर यांनी मानले.विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा आहे. पर्यटन महोत्सव एक आगळावेगळा प्रयत्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अप्रतिमच. मात्र, या महोत्सवाबाबत पुरेशी जनजागृती केली जात नाही. तसे झाल्यास या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल.- राजेश डागा, उद्योजक, अमरावती