शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

माधुरीच्या मारेकऱ्यांना अटक करा

By admin | Updated: August 21, 2016 00:02 IST

भातकुली तालुक्यामधील भालसी येथील रहिवासी व मुंबई येथील वरळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत महिला शिपाई माधुरी सोळंके हिच्या हत्येप्रकरणी...

मागणी : शिवसेनेसह विविध संघटनांचे शासनाला निवेदनअमरावती : भातकुली तालुक्यामधील भालसी येथील रहिवासी व मुंबई येथील वरळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत महिला शिपाई माधुरी सोळंके हिच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्यास तत्काळ अटक करावी या मागणीसाठी शनिवारी शिवसेना, भाजपासह विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. माधुरी सोळंके या १४ आॅगस्टला कर्तव्य बजावून उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत म्हणून तिच्या बहिणीने वरळी ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी तक्रार घेतली व तिचा मृतदेह आढळला व बेवारस म्हणून नोंद केली. वरळी ठाण्यात माधुरीच्या बहीणीची तक्रार वेळीच घेतली असती तर तीचा शोध घेता आला असता. मात्र, ती एक पोलीस शिपाई असताना सुध्दा वरळी ठाण्यात कुठलेही सहकार्य करण्यात आलेले नाही. किबंहूना पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केला. माधुरीच्या गळ्यावर, हातावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. माधुरीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, नाना नागमोते व माधुरीच्या आई-वडिलांनी केली. या घटनेची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष कृष्णराव चव्हाण, आदिवासी पारधी विकास परिषदेचे शिवलाल पवार, त्रिरीष चव्हाण, रेखा पवार, बन्सीलाल पवार, पन्नालाल मावळे, भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडीचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी, पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, पांडूरंग चव्हाण, सुखदेवराव पवार, आदिवासी पारधी समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सुखदेवराव पवार, विवेक इंगोले, राजेश चव्हाण, चरणदास सोळंके, देवीदास चव्हाण, पंजाबराव पवार, राजेंद्र सोळंके आदींनी केली. (प्रतिनिधी)