शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सेनेतील एकदिली आश्‍चर्यकारक

By admin | Updated: May 17, 2014 23:13 IST

आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता

अमरावती : आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी  सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता आलेख ज्या  वेगाने वाढत होता, ती गती बघून कुण्याही राजकीय नेत्याचे याबाबत दुमत नव्हते. खरे तर विधिमंडळातील  सहकारी या नात्याने राणा यांना सर्व सहा आमदारांशी विशेष जवळीक निर्माण करून परिपक्व राजकीय खेळी  खेळता आली असती; परंतु राणा यांनी ती संधी अडसुळांना उपलब्ध होऊ दिली. 
अमरावतीत वास्तव्य नसल्याची नाराजी सामान्यांमध्ये असली तरी आमदारांना विश्‍वासात घेऊन सामान्यांच्या त्या  नाराजीवर अडसुळांनी रामबाण उपाय खूप आधीच योजला होता. अब की बार, मोदी सरकार ही लाट होतीच.  अमरावतीतील मरगळेलल्या  भाजपक्षामध्ये या लाटेने कमालीचा उत्साह संचारला. तिकीट शिवसेनेच्या उमेदवाराला  मिळाले असा जराही भाव भाजपजनांमध्ये जाणवत नव्हता. जणू तिकीट भापलाच असावे, असा उत्साहाचा भर  भाजपमध्ये होता. संघाच्या पठडीत तयार झालेले मुरब्बी स्थानिक नेते कसोशीने कामाला लागले होते. मोदी यांनी  मंजूर केलेल्या सभांमध्ये अमरावतीचा नामोल्लेख पूर्वी नव्हताच. ऐनवेळी ती मिळविणे आणि मोदी खूश होतील अशी  गर्दी जमविणे हे दिव्य भाजपजनांनी तीन ते चार दिवसांत पार पाडले होते. संकल्पाच्या जोरावरच ते शक्य होऊ  शकले होते. मोदींनी अमरावतीच्या सभेत बाळासाहेबांचा आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण  झाले. त्यानंतर अचानक शिवसेना ज्या एकदिलाने कामाला लागली, ते आश्‍चर्यच होते. उद्धव ठाकरे यांनी  अमरावतीत येऊन शिवसैनिकांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षेचा मनापासून मान राखण्यात आला. अंतर्गत कलह  म्हणूनच शिवसैनिकांनी बाजूला सारला. 
मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे गहाळ झाल्यामुळे उडालेला गोंधळ प्रवीण पोटे,  दिगंबर डहाके, सोमेश्‍वर  पुसतकर, किरण पातूरकर, संजय बंड, यांच्यासारख्या नेत्यांनी कौशल्याने हाताळला. जिल्हाधिकारी कार्यालयात  पोहोचून,  तक्रारींचे काय ते मग बघू. हाती आहे त्यातील अधिकाधिक मतदान कसे करवून घेता येईल यासाठी  फळी कामाला लाऊ, असा आग्रह या नेत्यांनी धरला. गोंधळी स्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात होऊ शकणारी हानी  त्यामुळे मोठय़ा प्रमाणात  आटोक्यात आली. 
अडसूळ यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, स्त्रिचारित्र्याच्या मुद्यावरून त्यांची झालेली कोंडी, बाहेरचे पार्सल असा  विरोधकांनी ताकदीने केलेला प्रचार यापैकी कुठल्याही नकारात्मक मुद्यांचा स्वत:वर प्रभाव होऊ न देता  भाजप-सेनेच्या बहाद्दरांनी केलेल्या अथक परिश्रमाचा सुगंध आता दरवळतोय. अमरावतीकरांनी टाकलेल्या  विश्‍वासाचे आनंदराव सोने करतीलच, अशी अपेक्षा तमाम अमरावतीकरांना आहे.