शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टाटा, बिर्लाची औलाद आहात का?

By admin | Updated: July 2, 2017 00:04 IST

कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका,....

पालकमंत्री बँकर्सवर संतापले : १० हजारांच्या कर्ज वाटपास ५ जुलै ‘डेडलाईन’लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका, तुम्हीदेखील शेतकऱ्यांची मुलं आहात. शेतकऱ्यांशी सौजन्याने वागा, चांगले बोला. कुठल्याही परिस्थितीत पाच जुलैच्या आत पात्र शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्जवाटप झालेच पाहिजे. नंतर मी शांत बसणार नाही, अशा कठोर शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी खरीप पीककर्ज वाटपाच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.भातकुली तालुक्यातील विनोद भटकरसहित काही शेतकरी पीक कर्जासंर्दभात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांच्याशी संवाद न साधता, शेतकऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवल्याच्या प्रकारामुळे पालकमंत्री चांगलेच संतापले. शासनाने तातडीचे कर्ज वाटपासाठी १४ जूनला जीआर काढला, आता एक जुलै आहे, एकाही शेतकऱ्यांना तातडीचे कर्जवाटप झालेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीचे निर्णय घेत असताना त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने हमी घेतली असताना कर्जवाटप झालेच पाहिजे. लगतच्या अकोला जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू केले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या हृदयातील ओलावा कमी होत आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची मानसिकता पाहिजे, असे सांगत पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी केलेल्या उद्दामपणाचे उदाहरणे देऊन उपस्थित बँक अधिकाऱ्यांना या उर्मठपणाचा जाब विचारला.जिल्ह्यात खरिपाचे कर्जवाटपात प्रगती नसल्याबाबत सर्व बँक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले.शासनाने शेतकऱ्यांना वाटप करायच्या १० हजारांच्या कर्जाची हमी घेतली असतांना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडिच्या स्वरूपात कर्ज वाटप झालेच पाहीजे, २४ तासाच्या आत कर्जवाटप सुरू करा, यासंबधी तुमच्या वरिष्ठांची संवाद साधा,मात्र कुठल्याही परिस्थितीत कर्ज वाटप झालेच पाहिजे, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली. शासनाचे कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात किमान तीन लाखांवर शेतकरी कर्जसाठी पात्र असताना केवळ २७ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र आहेत.लाख नवे खातेदार आहेत, तर ४३ हजार शेतकरी नियमित खातेदार आहेत. दीड लाखांचे कर्ज शासनाने माफ केल्याने या निकषातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही पहिली जबाबदारी, दीड लाखांवर कर्ज असनाऱ्या शेतकऱ्यांचे शासन निर्णयाप्रमाणे वनटाईम सेटलमेंट करणे व ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केलेला आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांना २५ हजारापर्यंत मदतीचा दिलासा मिळायला हवा, यासर्व बाबी तातडीने पूर्ण कराव्यात आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.उद्रेक झाल्यास बँकअधिकाऱ्यांवर एफआयआरशेतकऱ्यांना तातडीने १० हजारांच्या कर्जाचे वाटप झालेच पाहिजे,कधी पर्यत वाटणार आताच सांगा?आम्हाला सुचना नाहीत हे चालणार नाही,शासन निर्णय झाला, शासनाने हमी घेतली तरी किती दिवस वरिष्ठांसी संवाद साधणार, शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.प्रत्येक बँकांना पत्र दिले, बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली, संवाद झाला, अश्या स्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पहिला एफआयआर बॅकर्सवर दाखल करू, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी कर्ज वाटपाच्या बैठकीत दिली.कर्जवाटपाचा रोजचा लेखाजोखा डिडीआर व एलडीएम यांनी सादर करावा,असे निर्देश त्यांनी दिले.