शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

टाटा, बिर्लाची औलाद आहात का?

By admin | Updated: July 2, 2017 00:04 IST

कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका,....

पालकमंत्री बँकर्सवर संतापले : १० हजारांच्या कर्ज वाटपास ५ जुलै ‘डेडलाईन’लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका, तुम्हीदेखील शेतकऱ्यांची मुलं आहात. शेतकऱ्यांशी सौजन्याने वागा, चांगले बोला. कुठल्याही परिस्थितीत पाच जुलैच्या आत पात्र शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्जवाटप झालेच पाहिजे. नंतर मी शांत बसणार नाही, अशा कठोर शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी खरीप पीककर्ज वाटपाच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.भातकुली तालुक्यातील विनोद भटकरसहित काही शेतकरी पीक कर्जासंर्दभात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांच्याशी संवाद न साधता, शेतकऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवल्याच्या प्रकारामुळे पालकमंत्री चांगलेच संतापले. शासनाने तातडीचे कर्ज वाटपासाठी १४ जूनला जीआर काढला, आता एक जुलै आहे, एकाही शेतकऱ्यांना तातडीचे कर्जवाटप झालेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीचे निर्णय घेत असताना त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने हमी घेतली असताना कर्जवाटप झालेच पाहिजे. लगतच्या अकोला जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू केले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या हृदयातील ओलावा कमी होत आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची मानसिकता पाहिजे, असे सांगत पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी केलेल्या उद्दामपणाचे उदाहरणे देऊन उपस्थित बँक अधिकाऱ्यांना या उर्मठपणाचा जाब विचारला.जिल्ह्यात खरिपाचे कर्जवाटपात प्रगती नसल्याबाबत सर्व बँक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले.शासनाने शेतकऱ्यांना वाटप करायच्या १० हजारांच्या कर्जाची हमी घेतली असतांना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडिच्या स्वरूपात कर्ज वाटप झालेच पाहीजे, २४ तासाच्या आत कर्जवाटप सुरू करा, यासंबधी तुमच्या वरिष्ठांची संवाद साधा,मात्र कुठल्याही परिस्थितीत कर्ज वाटप झालेच पाहिजे, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली. शासनाचे कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात किमान तीन लाखांवर शेतकरी कर्जसाठी पात्र असताना केवळ २७ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र आहेत.लाख नवे खातेदार आहेत, तर ४३ हजार शेतकरी नियमित खातेदार आहेत. दीड लाखांचे कर्ज शासनाने माफ केल्याने या निकषातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही पहिली जबाबदारी, दीड लाखांवर कर्ज असनाऱ्या शेतकऱ्यांचे शासन निर्णयाप्रमाणे वनटाईम सेटलमेंट करणे व ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केलेला आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांना २५ हजारापर्यंत मदतीचा दिलासा मिळायला हवा, यासर्व बाबी तातडीने पूर्ण कराव्यात आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.उद्रेक झाल्यास बँकअधिकाऱ्यांवर एफआयआरशेतकऱ्यांना तातडीने १० हजारांच्या कर्जाचे वाटप झालेच पाहिजे,कधी पर्यत वाटणार आताच सांगा?आम्हाला सुचना नाहीत हे चालणार नाही,शासन निर्णय झाला, शासनाने हमी घेतली तरी किती दिवस वरिष्ठांसी संवाद साधणार, शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.प्रत्येक बँकांना पत्र दिले, बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली, संवाद झाला, अश्या स्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पहिला एफआयआर बॅकर्सवर दाखल करू, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी कर्ज वाटपाच्या बैठकीत दिली.कर्जवाटपाचा रोजचा लेखाजोखा डिडीआर व एलडीएम यांनी सादर करावा,असे निर्देश त्यांनी दिले.