शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:32 IST

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील.

ठळक मुद्देउभारणीसाठी ई-निविदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी यू-डायस २०१८-१९ च्या माहितीवरून आणि जिल्हा परिषद, महापालिकेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकषांना आधारभूत ठेवून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील मीत एंटरप्रायजेस या पुरवठादाराकडून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीनंतर गठित समितीमार्फत भेट देऊन साहित्याची पडताळणी करण्यात येणार आहे. समिती पथकाच्या पडतळणीपर्यंतची जबाबदारी पुरवठादार, मुख्याध्यापकांवर असणार आहे. नावीन्यपूर्ण केंद्राचा वापर शाळांनी दररोज करावा, असे राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी माध्यमांच्या ७९८, तर उर्दू माध्यमाच्या १०० शाळांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.मुख्याध्यापकांकडे जबाबदारीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे केंद्र साकारण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. विद्युत पुरवठ्यासह ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्याध्यापकांना कळविले आहे तसेच शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीची प्रक्रिया करताना गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.जिल्हानिहाय मंजूर केंद्रअहमदनगर- ३०, अकोला -२४, अमरावती -४५, औरंगाबाद -२२,भंडारा- १४, बीेड- २४, बुलडाणा- ३९, चंद्रपूर- ४५, धुळे- १५, गडचिरोली -२४, गोंदिया- १६, हिंगोली -१०, जळगाव -३२ जालना- १६, कोल्हापूर- ३८, लातूर- २४, मुंबई- २४, नागपूर- ५४, नांदेड -३४, नंदूरबार-१२, नाशिक -३६, उस्मानाबाद- १६, पालघर -१६, परभणी -३०, पुणे -४०, रायगड-३०, रत्नागिरी- १८, सांगली -२२, सातारा-२२, सिंधुदूर्ग- १६, सोलापूर-२६, ठाणे- २४,वर्धा- १६, वाशिम- १२, यवतमाळ- ३२

टॅग्स :scienceविज्ञान