शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:32 IST

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील.

ठळक मुद्देउभारणीसाठी ई-निविदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी यू-डायस २०१८-१९ च्या माहितीवरून आणि जिल्हा परिषद, महापालिकेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकषांना आधारभूत ठेवून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील मीत एंटरप्रायजेस या पुरवठादाराकडून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीनंतर गठित समितीमार्फत भेट देऊन साहित्याची पडताळणी करण्यात येणार आहे. समिती पथकाच्या पडतळणीपर्यंतची जबाबदारी पुरवठादार, मुख्याध्यापकांवर असणार आहे. नावीन्यपूर्ण केंद्राचा वापर शाळांनी दररोज करावा, असे राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी माध्यमांच्या ७९८, तर उर्दू माध्यमाच्या १०० शाळांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.मुख्याध्यापकांकडे जबाबदारीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे केंद्र साकारण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. विद्युत पुरवठ्यासह ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्याध्यापकांना कळविले आहे तसेच शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीची प्रक्रिया करताना गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.जिल्हानिहाय मंजूर केंद्रअहमदनगर- ३०, अकोला -२४, अमरावती -४५, औरंगाबाद -२२,भंडारा- १४, बीेड- २४, बुलडाणा- ३९, चंद्रपूर- ४५, धुळे- १५, गडचिरोली -२४, गोंदिया- १६, हिंगोली -१०, जळगाव -३२ जालना- १६, कोल्हापूर- ३८, लातूर- २४, मुंबई- २४, नागपूर- ५४, नांदेड -३४, नंदूरबार-१२, नाशिक -३६, उस्मानाबाद- १६, पालघर -१६, परभणी -३०, पुणे -४०, रायगड-३०, रत्नागिरी- १८, सांगली -२२, सातारा-२२, सिंधुदूर्ग- १६, सोलापूर-२६, ठाणे- २४,वर्धा- १६, वाशिम- १२, यवतमाळ- ३२

टॅग्स :scienceविज्ञान